मुंबई

उन्हाच्या तडाख्यात फळांचा आधार

CD

वाशी, ता.२१(बातमीदार)ः उन्हाळा सुरू होताच एपीएमसीत फळ बाजारात परराज्यातून येणाऱ्या रसाळ फळांची आवक वाढली आहे. बाजारात सध्याच्या वातावरणात आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त अशी कलिंगड, टरबूजबरोबर पपई, द्राक्ष दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
वातावरणातील बदलाचे संकेत मिळताच बाजारात सध्या शरीराला थंडावा देणाऱ्या फळांच्या मागणीत झाली आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे रसाळ तसेच थंडगार फळांच्या रसाला अधिक पसंती दिली जात आहे. त्यामुळे आंब्यापाठोपाठ फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कलिंगडे देखील बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच सध्या तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक अशा परराज्यांसह महाराष्ट्रातील सोलापूर, सांगली, अक्कलकोट, गुलबर्गा येथून कलिंगड बाजारात दाखल होत आहेत. या कलिंगडाचा वापर खाण्यासाठी तसेच रस काढून देखील होत असल्याने शरीराला थंडावा देणाऱ्या फळांना ग्राहकांची पसंती मिळत आहे.
-------------------------------------
कलिंगडला सर्वाधिक मागणी
सध्या बाजारात कलिंगड ३२६० क्विंटल आवक होत असून प्रति क्विंटल ८०० ते १३०० रुपये तर किरकोळमध्ये ५० त ७० रु प्रतिनग दिले जात आहे. बाजारात शुगर बेबी आणि नामधारी या प्रजातीच्या कलिंगडची आवक सुरू असून शुगरबेबीला मागणी आहे.
-------------------------
खरबूज, पपई, संत्रीचा पर्याय
खरबूजची आवक १०२० क्विंटल असून प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपयांनी विकले जात आहे. तर ८१० क्विंटल पपई दाखल होत असून प्रती क्विंटल २५०० ते ३५०० रुपये दर आहे. तर संत्रीची आवक ९३२ क्विंटल असून ७ हजार ते ८ हजार रुपये प्रती क्विंटल दर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT