मुंबई

मोदी सरकार उद्योगपतींचे सरकार

CD

वाडा, ता. २२ (बातमीदार) : मोदी सरकारमुळे देशात महागाई वाढली आहे. राज्यघटना संपवण्याचे काम मोदी सरकार करीत असून ‘हम दो हमारे दो’ असे हे उद्योगपतींचे सरकार असल्याची घणाघाती टीका किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पराग पष्टे यांनी केली.
वाडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवारी वाडा येथे ‘हाथ से हाथ जोडो’ अभियानाची सुरुवात वाडा शहरात करण्यात आली. त्यावेळी पष्टे बोलत होते. यावेळी पराग पष्टे म्हणाले की, देशात वाढत असलेली महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सर्वसामान्य माणसांपर्यंत ‘हाथ से हाथ जोडो’ या अभियानातून घराघरात पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. काँग्रेसचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल पाटील यांनी आपल्या मनोगतातून मोदी सरकारवर टीका करून महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांनी खांद्याला खांदा लावून एकत्रित काम करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय औसरकर, कम्युनिस्ट पक्षाचे कल्पेश पाटील, शिवसेनेचे नेते निलेश गंधे, सत्यम ठाकूर आदींची भाषणे झाली. या अभियानात उद्धव ठाकरे गटाचे नेते उमेश पटारे, गोविंद पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील, सुरेश पवार, किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील, बहुजन विकास आघाडीचे भोईर, काँग्रेसचे मनिष गणोरे, दिलीप पाटील आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्वप्रथम वाडा शहरात रॅली काढण्यात आली. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर तिचे छोट्याखानी सभेत रूपांतर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar discussion with Fadnavis : पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरण ; अजितदादा मुख्यमंत्री फडणवीसांना नेमकं काय म्हणाले?

Pune Crime : लोणी काळभोर पोलीसांनी घातपाताचा कट केला उघड; ३ जण कोयत्यांसह घेतले ताब्यात!

Latest Marathi News Live Update: वंदे मातरम ला दीडशे वर्षे पूर्ण पारोळा येथे सामूहिक वंदे मातरम गायन

Pune University : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय: अर्धवट शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक वर्ष

Money Vastu Tips : खिशात एक रुपयाही टिकत नाही ? वास्तूचे हे उपाय करा आणि पैशांची होईल भरभराट

SCROLL FOR NEXT