मुंबई

जीवनवाहिनीचा अस्तित्वाशी लढा

CD

सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. २८ : राज्यभरातील सर्वात जास्त प्रदूषित चार नद्यांमध्ये रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीचा समावेश आहे, तर प्रदूषणाच्या तिसऱ्या वर्गवारीत कुंडलिका, पाताळगंगा नदी असून अंबा आणि उल्हास नदी पाचव्या वर्गवारीमध्ये आहेत. या पाच नद्या रायगड जिल्ह्याच्या जीवनवाहिन्या म्हणून ओळखल्या जात असून वाढते औद्योगिक प्रदूषणासह शहरातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे या नद्यांचा अस्तित्वाशी लढा सुरू असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
देशभरातील ६०३ नद्यांचे विश्लेषण सीपीसीबीच्या अहवालात करण्यात आले आहे. यापैकी ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील २७९ नद्यांमधील ३११ नदीपट्टे प्रदूषित असल्याचे आढळून आले. त्यात सर्वाधिक ५५ प्रदूषित नदीपट्टे महाराष्ट्रात आहेत. यात सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा आणि उल्हास या रायगड जिल्ह्यातील नद्यांचा समावेश आहे. नदीकाठच्या गावांमधील सांडपाणी आणि उद्योगांमधील सांडपाणी नदीत सोडले जात असून पाण्यातील ऑक्सिजनची पातळी खालावत चालली आहे. यातील रासायनिक घटक तसेच इतर टाकाऊ वस्तूंमुळे नद्यांचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते. पर्यायाने त्या भागातील नदीच्या परिसंस्था धोक्यात येणार असल्याने त्याचा दुष्परिणाम निसर्ग आणि मानवी आरोग्यावर होण्याची शक्यता या अहवालातून व्यक्त केली आहे.
---
रायगडमधील प्रदूषित नद्या
नदी / बायोकेमिकल ऑक्सिजनची पातळी/ प्रदूषणाचा वर्ग
सावित्री/ ५०.०/ अ
कुंडलिका/ १७.०/ क
पाताळगंगा/ ११/० क
अंबा/ ४.९/ ई
उल्हास/४.०/ ई
---
सावित्री नदी सांडपाण्याने प्रदूषित
महाड तालुक्यातून वाहणाऱ्या या नदीमध्ये शहर आणि आजूबाजूच्या गावांमधील सांडपाणी सावित्रीमध्ये सोडले जाते. या पाण्यामध्ये जीवजंतूचे प्रमाण जास्त असल्याने या पाण्यातील (बीओडी) बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांडची पातळी ५०.० मिलिग्रॅम इतकी आहे. तसेच महाड औद्योगिक वसाहतीमधील काही कंपन्यांचा औद्योगिक सांडपाणीही सावित्रीत सोडला जात असल्याने सावित्रीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
---
कुंडलिका नदीने नावलौकिक गमावला
सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये उगम पावणारी सर्वात शुद्ध गोड्या पाण्याची नदी म्हणून कुंडलिका नदीचा नावलौकिक संपूर्ण महाराष्ट्रात होता. कुंडलिका नदीवरील डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आलेला असून या बंधाऱ्यातून येथील मोठमोठ्या उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. अलिबाग तालुक्याची तहान एमआयडीसीच्या पाण्यावर भागते. कलिंगड, वाल यांसारख्या भाजीपाल्याची शेती बहरत होती. रोहा शहरापर्यंत ही अमृतगंगा असणारी ही नदीचे सांडपाण्यामुळे सांडपाण्यामुळे गटारगंगा झाली आहे.
---
खोपोलीचे सांडपाणी पाताळगंगेत
खोपोली नगरपालिका हद्दीतील सर्वच पाणी पाताळगंगेत सोडले जाते. त्याचबरोबर खोपोलीच्या हद्दीतील कंपन्यांमधूनही पाणी नदीत सोडण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे नदीतील पाण्याची बीओडी पातळी ११.० पर्यंत वाढली आहे. खोपोली नगरपालिका हद्दीतील वाढत्या शहरीकरणामुळे पाताळगंगेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने खोपोली नगरपालिकेला नोटीस बजावत उपाययोजना करण्यास सांगितले आहे.
---
अंबा नदीला औद्योगिकीकरणाचा फटका
सुधागड, रोहा आणि पुढे पेण तालुक्यातून वाहत धरमतर खाडीला जाऊन मिळणाऱ्या नदीच्या काठावर जेएसडब्ल्यू, रिलायन्स पेट्रोकेमिकल्स यांसारखे मोठे कारखाने आहेत. नागोठणे परिसरातही औद्योगिकीकरण वाढत चालले आहे. या नदीच्या किनाऱ्यावर नागोठणे गाव सोडल्यास इतर मोठे गाव नाही; तरीही प्रदूषण पातळी मर्यादेपेक्षा जास्त आहे. यामुळे हे पाणी पिण्यासाठी घातक ठरत आहे. वाढत्या प्रदूषणामुळे या नदीतील मासेमारीही संकटात आली आहे.

---
उल्हास नदीत वाढते प्रदूषण
खंडाळा घाटात उगम पावणाऱ्या उल्हास नदीला चिल्हार, पेज, पोशीर नद्या येऊन मिळतात. कर्जत तालुक्यातून पुढे ठाणे जिल्ह्यातील कल्याणच्या खाडीला जाऊन मिळणाऱ्या या उल्हास नदीने कर्जत तालुका सुजलाम-सुफलाम झालेले आहे. उल्हास आणि तिच्या जोडनद्यांवर येथील अनेक पाणीपुरवठा योजना सुरू आहेत. मात्र, वाढत्या नागरीकरणामुळे ही नदी दूषित होत आहे.
---
प्रदूषणकारी कारखान्यांवरील कारवाई
नोटिसा - १४६
कारणे दाखवा नोटीस - ५०
कारभार बंद करण्याचे आदेश - १८
---
या नद्यांच्या पाण्याचे नमुने जमा केले होते. हे विश्लेषण गोड्या पाण्याच्या गुणवत्तेचे आहे. बायोकेमिकल ऑक्सिजनची मागणी किमान ३.० मिलिग्रॅम प्रतिलिटर असेल, तर पाणी पिण्यासाठी योग्य असते; परंतु रायगडमधील पाच नद्यांनी ही पातळी ओलांडली आहे.
- विद्याधर किल्लेदार, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT