मुंबई

आरटीई प्रवेशासाठी अर्जांचा पाऊस

CD

वसंत जाधव, सकाळ वृत्तसेवा
नवीन पनवेल ता.२६ ः शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलाच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला पालकांनी उदंड प्रतिसाद दिला असून एका जागेसाठी सरासरी चौदापेक्षा जास्त अर्ज आले आहेत. १ ते २५ मार्चदरम्यान २२०० जागेसाठी पनवेलमधील ३१,७८९ पालकांनी आपल्या पाल्यांचे अर्ज दाखल केले आहेत. आरटीई प्रवेशप्रक्रियेद्वारे स्वयं अर्थसहायित खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येतात.
आरटीईअंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर मोफत प्रवेश मिळवण्यासाठी पालक ऑनलाईन अर्ज करतात. २०२३-२४ मध्ये नवीन प्रवेश घेण्यासाठी अंतिम तारीख २५ मार्चपर्यंत होती. आपल्‍या मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, असे प्रत्‍येक पालकाला वाटते. मात्र ज्या शाळेची गुणवत्ता, सोयी सुविधा चांगल्या आहेत, तेथील शैक्षणिक फी सर्वांनाच परवडते असे नाही. त्यासाठी बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये २५ टक्‍के जागा राखीव असतात. या जागांवर मोफत प्रवेश मिळण्यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवली जाते. या प्रवेश प्रक्रियेचा लाभ राज्यातील आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना होतो.

अशी होते अर्जांची निवड
- अर्जांची निवड ऑनलाईन स्वरूपातच लॉटरीच्या माध्यमातून होते. अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितके जवळ आपण राहता, तितकी आपल्या अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त आहे. त्यासाठीचे लॉजिकही शासनाच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.
- शाळेपासून पहिल्या एक किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिक्त जागेसाठी प्राधान्याने विचार करण्यात येतो. त्यानंतर १ ते ३ किलोमीटर आणि ३ किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांचा विचार होतो.
- एखाद्या खासगी शाळेत एकूण विद्यार्थी संख्या १०० आहे. तर त्याच्यापैकी २५ टक्के म्हणजेच एकूण २५ विद्यार्थी आरटीईमार्फत प्रवेश घेऊ शकतात. त्याचवेळी तितकेच २५ विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात.
- त्या शाळेसाठी एक किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या १५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल. तर १ ते ३ किलोमीटर परिसरातील ३० मुलांनी आणि ३ किलोमीटरवरील २० अर्ज प्राप्त झाले असतील. अशा स्थितीत एक किलोमीटरच्या आतील सर्वच्या सर्व १५ विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जातो. त्यानंतरच इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होतो.
- प्रवेश देतांना अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी होते. त्यामध्ये तफावत आढळून आल्यास अर्ज बादही ठरवला जाऊ शकतो.

कोरोनाने पालक गमावलेल्या बालकांना आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राखीव जागांवर प्रवेश देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. बालकांच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारी संपली असून मुदतीनंतर कुठल्याही अर्जाची दखल घेणार नसल्याच्या सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.
- पुनिता गुरव, प्राथमिक शिक्षणाधिकारी

पनवेल तालुक्यासाठी आरटीई प्रवेशाकरिता यंदा ११० शाळा असून, त्यामध्ये २ हजार २०० जागा उपलब्ध आहेत. यासाठी ३१ हजारांहून जास्त पालकांनी अर्ज केल्‍याची नोंद आहे. आठ दिवसांत लॉटरी प्रक्रिया होऊन अर्ज छाननी सुरू होईल.
- सीताराम मोहिते, गटशिक्षण अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT