मुंबई

आंतरराष्ट्रीय विमानतळावर १८ किलो सोने जप्त

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : सुमारे दहा कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली. आरोपी महिलांकडून १८ किलो सोने जप्त करण्यात आले. या प्रकरणी सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अर्दो नूर, शुक्री फराह, केरो जामा, हबीबा उमर, एब्ला अब्दुलाही, अनाब मुहुमेद, अनीसा मुबारक, इस्निना युसूफ, जैनाब मोहमुद या महिलांना अटक करण्यात आली. या सर्व महिला कापड विक्री व्यवसायाशी संबंधित असून, त्या २६ ते ४७ वयोगटातील आहेत. परदेशी महिलांना सोन्याच्या तस्करीप्रकरणी अटक झाल्याची आठवड्यातील ही दुसरी घटना आहे.

केनिया एअरवेजच्या विमानाने मुंबई विमानतळावर आलेल्या नऊ महिलांना मंगळवारी सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तवार्ता कक्षाच्या एआय युनिटच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. त्यांना तस्करी करून काही वस्तू आणल्याबाबत विचारले असता महिलांनी नकारार्थी उत्तर दिले. त्यामुळे त्यांच्याकडील सामानाची तपासणी करण्यासाठी त्यांना थांबवून एका खोलीत बसवण्यात आले. त्या वेळी आरोपी महिलांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यांना पुन्हा प्रवेशद्वाराजवळून एआययूच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले. तपासणीत त्यांच्याकडे २५ कॅरेटचे १३ हजार ६४० ग्रॅम सोने सापडले. २१ कॅरेटचे २३४० ग्रॅम व १८ कॅरेटचे ११३६ ग्रॅम सोने तसेच ११३६ ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. आरोपी महिलांकडून एकूण १८ किलो २८० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत नऊ कोटी ४२ लाख रुपये आहे. या प्रकरणी सीमा शुल्क कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सात महिलांना अटक करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: "काँग्रेसने 70 वर्षात इतकी कमाई केली नाही, जेवढी भाजपनं 10 वर्षात केली"; प्रियंका गांधींची टीका

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT