मुंबई

मुंबईतील कचरा विल्हेवाटीचा बोजवारा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १६ : शहरातील बदलत्या वातावरणामुळे तसेच अस्वच्छता, कचरा व्यवस्थापन प्रक्रियेमुळे वायुप्रदूषण, उष्णतेच्या लाटा आणि प्रदूषित झालेले पाण्याचे स्रोत अशा गंभीर समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे गेल्या १० वर्षांत नागरिकांच्या वायुप्रदूषणाच्या तक्रारीत २३७ टक्क्यांनी; तर कचरा विल्हेवाटीच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शहरातील डम्पिंग ग्राऊंडवर दररोज वाहतूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याचा पालिकेचा उद्देशही सफल झालेला नाही. २०२० व २०२२ मध्ये यात १० टक्क्यांनी वाढ झाली. एकूणच हवामानातील बदल व कचऱ्याचे व्यवस्थापन होत नसल्याने मुंबईकरांना प्रदूषणाला सामोरे जावे लागते आहे.

प्रजा फाऊंडेशनने आज मुंबईतील नागरी समस्येवर अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात घनकचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि हवा व पाण्याच्या गुणवत्तेकडे लक्ष वेधले आहे. २०१३ पासून २०२२पर्यंत नागरिकांच्या वायुप्रदूषणाच्या तक्रारींमध्ये २३७ टक्क्यांनी; तर घनकचरा व्यवस्थापनाच्या तक्रारींमध्ये १२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१८-२०१९ पर्यंतच्या कालावधीत मुंबईत दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यावेळी मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांना कचऱ्याची विल्हेवाट सोसायटींमध्येच लावण्याचे पालिकेने बंधनकारक केले होते. त्यामुळे रोज जमा होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाणही कमी करण्यात पालिकेला यश आले होते; मात्र त्यानंतर मोहिमेची अंमलबजावणी थंडावल्याने रोजच्या कचऱ्याच्या प्रमाणातही वाढ झाली. २०२२ मध्ये कचरा निर्माण करणाऱ्या २,८२५ गृहनिर्माण संस्थांपैकी १४०१ म्हणजेच ५० टक्के संस्थांनी कचरानिर्मितीच्या ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावली नाही. त्यामुळे प्रदूषणामध्येही वाढ झाल्याचे निरीक्षण ‘प्रजा’ने मांडले आहे.

कचऱ्याचे प्रमाण १० टक्क्यांनी वाढले
डम्पिंग ग्राऊंडमध्ये वाहतूक करण्यात येणारा कचरा कमी करण्याची गरज असल्याचे म्हटले जाते; मात्र २०२० ला डम्पिंग ग्राऊंडवर दररोज ६,९०४ मेट्रिक टन कचरा वाहतूक करण्यात आला. २०२२ मध्ये दररोज ७,५८२ मेट्रिक टन कचऱ्याची वाहतूक करण्यात आली असून, यात १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून नमूद करण्यात आले आहे.

महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनेची कार्यक्षमता सुधारणे, मलनिस्सारण प्रक्रिया आणि हवेची उत्तम गुणवत्ता अशा ठोस उपाययोजनांचा समावेश केला आहे, हे एक सकारात्मक पाऊल आहे.
- निताई मेहता, संस्थापक, प्रजा फाऊंडेशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT