मुंबई

विक्रमगडमधील पाच गावांचा पर्यावरणपूरकमध्ये कायापालट

CD

विक्रमगड, ता. ४ (बातमीदार) : तालुक्यातील आदिवासी गावांचा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कायापालट करण्यात येत आहे. ही पर्यावरणपूरक गावे झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पाच १०० टक्के गावांमध्ये रोजगारनिर्मिती होण्यासाठी मदत झाली आहे.

विक्रमगड तालुक्यातील डोल्हारी खुर्द, सातकोर, देवपूर, आनंदपूर आणि घाटलपाडा या पाच गावांमध्ये एसबीआय फाऊंडेशन आणि श्री चैतन्य हेल्थ ॲण्ड केअर ट्रस्ट, गालतरे यांच्या संयुक्त विद्यमाने ऑक्टोबर २०२२ पासून एसबीआय ग्राम सेवा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या गावांमध्ये विविध प्रकारच्या विकासकामांबरोबर पर्यावरण संतुलन, जलसंधारण, जनावरे, शेतीसह पिण्याचे पाणी यासाठी पाच गावांमध्ये एकूण २८ खड्डे, सहा शेत तलावांचे खोदकाम करण्यात आले. तलाव, खड्ड्यांच्या माध्यमातून जवळपास २०० ते २५० कुटुंबांना शेतीसाठी व शेतीपूरक व्यवसायासाठी पाण्याचा उपयोग होतो. त्यामुळे वर्षभरासाठी पाच गावांतील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तलावातील पाणीसाठा पाहून दत्तक गावांतील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिलांच्या चेहऱ्यावर हासू
पूर्वी पाणीटंचाईमुळे गावातील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी जीव धोक्यात टाकून दोन ते चार तास वेळ विहिरीवर खर्च करावा लागत होता, मात्र आता तलावातील पाणी लोकांना उपलब्ध झाल्याने महिला वर्ग, तसेच गावकरी यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी दत्तक गावांतील कुटुंबांच्या माध्यमातून तीन हजार झाडांची लागवड करण्यात आली. त्यामुळे वृक्ष लागवड करण्याबरोबरच प्रत्येक रोपाचे योग्य जतन, संगोपन केले जाते.

कचरा, प्लास्टिकमुक्तीचा नारा
कचरा निर्मूलन करण्यासाठी कचरा गाडी खरेदी करून पाच गावांतील ओला आणि सुका कचरा गोळा केला जातो. तसेच प्लास्टिकही गोळा केले जाते. या माध्यमातून गाव फक्त कचरामुक्त न करता प्लास्टिकमुक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. गावकऱ्यांनी सोडलेला नाशवंत आणि नाश न होणारा कचरा एकाच वेळी गोळा करण्यासाठी सहभागी गावामध्ये या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा उद्देश पर्यावरणीय स्वच्छतेबद्दल जागरुकता वाढवणे आणि सार्वजनिक जागा स्वच्छ ठेवण्यासाठी गावकऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे हे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : वक्फ कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, 'या' तरतुदींना दिली स्थगिती, संपूर्ण कायदा रद्द करणार?

Mumbai Rain: मुंबईत विजांसह ढगांचा गडगडाट! पुढील ३ तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

Duleep Trophy Final : 4,4,W,4,W! CSK च्या गोलंदाजाचं मजेशीर षटक; पण, RCB च्या रजत पाटीदारच्या संघाला जेतेपद

Latest Marathi News Updates : सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी, करमाळ्यातील कोर्टी गाव पाण्याखाली

Asia Cup 2025 Point Table : टीम इंडिया Super 4 मध्ये पोहोचली! पाकिस्तानला काय करावं लागेल?; ब गटात आघाडीसाठी मारामारी

SCROLL FOR NEXT