अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांनाही टीईटी अनिवार्य
गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षण विभागाचे पाऊल
मुंबई, ता. २ : राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांवर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त झालेल्या आणि नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने या शिक्षकांना टीईटी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुकंपा तत्त्वावरील शिक्षकांना केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीमधून सवलत देण्यात येत असली तरी त्यांना टीईटी अनिवार्य करण्यात आली आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये अनुकंपा तत्त्वावर प्राथमिक शिक्षक या पदावर नियुक्ती दिलेल्या व वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी देण्यात आला आहे. त्यांना पुढील तीन वर्षांत टीईटीची परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे.
--
प्राथमिक शिक्षकांना अनुदानित शिक्षण संस्थांनी अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती दिलेली आहे; परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही, अशा उमेदवारांनादेखील तीन वर्षांच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अर्हता धारण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्त्वावर मान्यता, शालार्थ आयडी देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तसेच, जे शिक्षक टीईटी पात्र होऊ शकत नाहीत. अशा उमेदवारांची सेवा ज्येष्ठता, शिक्षक प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.