मुंबई

माणगावला वाहतूक कोंडीचा विळखा

CD

माणगाव, ता. १३ (बातमीदार) ः शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. बाजारपेठेसह मुंबई-गोवा महामार्गावर दररोज कोंडी होत असल्‍याने स्‍थानिकांसह वाहनचालक, प्रवासी हैराण झाले असून, वादाचेही प्रसंग उद्‌भवत आहेत. याशिवाय ओव्हरटेकच्या नादात अपघातही होत आहेत. आठवडाभरापासून माणगाव महामार्गावर दीड-दोन किलोमीटरच्या रांगा लागत आहेत, मात्र त्‍याकडे वाहतूक पोलिसांसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष होत आहे. त्‍यामुळे संतप्त स्‍थानिक नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.
रायगडच्या पालकमंत्रिपदाचा प्रश्न जसा अधांतरी लटकला आहे, तसाच माणगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्नही गंभीर बनला असून, यात नागरिकांसह परिसरातील व्यावसायिक भरडले जात आहेत. माणगाव तालुक्‍यात दररोज लहान-मोठे अपघात होत ठोस कार्यवाही सोडा, मात्र तात्पुरत्‍या उपाययोजनाही करण्यात आलेल्‍या नाहीत. राजकीय स्‍वार्थासाठी एकवेळ पालकमंत्रिपदाचा प्रश्न नेतेमंडळी सामंजस्‍याने सोडवतील, परंतु माणगावच्या वाहतूक कोंडीचा फेरा सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार नाहीत, अशीच स्‍थिती असल्‍याचे स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे.
काही महिन्यांपूर्वी माणगाव तहसील कार्यालयात वाहतूक कोंडीबाबत आढावा बैठक झाली होती, परंतु पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही. माणगावला दोन मंत्री मिळाले आहेत, परंतु वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिकच तीव्र होत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण करणाऱ्या एका ठेकेदारावर काम वेळेत पूर्ण न केल्याने तातडीने कारवाई करून थेट गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निविदा काढून दुसऱ्या ठेकेदाराला नियुक्त करण्यात आले आहे, मात्र आता पावसाळा सुरू होणार असल्‍याने किमान वर्षभर तरी कोंडीतून सुटका होणार नाही, असे दिसत आहे.

वेळोवेळी पोकळ आश्‍वासने
मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न देशाच्या संसदेत आणि राज्याच्या विधानसभेतही वारंवार उपस्थित झाला आहे. जवळपास १७ वर्षे झाली तरी, काम अपूर्ण असल्‍याने सामाजिक संघटनांनी वेळोवेळी आंदोलने केली. त्यांना वेळोवेळी पोकळ आश्‍वासने देण्यात आली. महामार्गानंतर समृद्धी आणि पश्चिम महाराष्ट्रात विविध महामार्ग झाले. माणगावमधील अवघड असा दिघी-पुणे महामार्गही झाला, परंतु महामार्गाचे काम अद्याप पूर्ण न झाल्‍याने विकासाच्या दृष्टीने कोकण मागे असल्‍याचे वास्तव आहे.

अपघातात हजारोंचे बळी
महामार्गाचे काम सुरू असल्‍यापासून आतापर्यंत चार ठेकेदार तर पाच सरकारे आली तरी काम पूर्ण होऊ शकले नाही. आंदोलने, मोठी दुर्घटना घडल्‍यास सरकारकडून आश्वासने दिली जातात, मात्र त्‍यांची अद्याप पूर्तता झालेली नाही. रस्‍त्‍याची दुरवस्‍था, अपुऱ्या कामांमुळे आतपर्यंत हजारोंचे बळी गेले आहेत. त्‍यामुळे आता स्‍थानिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

माणगाव ः आठवडाभरापासून रोजच वाहतूक कोंडी उद्‌भवत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT