मुंबई

जन्म मृत्यूचे ४२० प्रमाणपत्र रद्द

CD

जन्म-मृत्यूची ४२० प्रमाणपत्रे रद्द
कल्याण-डोंबिवलीतील नागरिकांना फेर अर्ज सादर करण्याची नोटीस
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २ : जन्म-मृत्यू नोंदणीसाठी शासनाने सुधारित कार्यपद्धती निश्चित केली आहे. त्यामुळे ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीतील जन्म-मृत्यूचे दाखले रद्द केले आहेत. यानुसार कल्याण-डोंबिवलीत जन्माची सुमारे १९२, तर मृत्यूची सुमारे २२७ प्रमाणपत्रे रद्द होणार आहेत. पालिका प्रशासनाच्या वतीने ही प्रक्रिया सुरू केली असून, आतापर्यंत सुमारे ७५ च्या आसपास प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. प्रमाणपत्र रद्द झालेल्या नागरिकांना प्रशासनाकडून नोटीस पाठविण्यात येत आहे. त्यांना फेर अर्ज सादर करण्याविषयी सूचना देण्यात येत आहे. नागरिकांना आता पुन्हा आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज करून हेलपाटे मारावे लागणार आहेत.

उशिरा जन्म व मृत्यू नोंद केल्यामुळे प्रमाणपत्र देण्यावर लावलेली स्थगिती उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जन्म-मृत्यू नोंदणीसाठी सुधारित कार्यपद्धती निश्चित केली असून, ऑक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत, ते रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून पालिका स्तरावर तशा सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकांनीदेखील नागरिकांना याविषयी सूचित करण्यास सुरुवात केली आहे. या आदेशानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या वतीने याविषयी जाहीर नोटीस काढली आहे.

कल्याण-डोंबिवलीत सुमारे ४२० नागरिकांची प्रमाणपत्रे रद्द होणार आहेत. यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याच्या घडीला जन्माचे दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू असून, दिवसाला १५ ते २० दाखले रद्द करण्याची प्रक्रिया केली जात आहे. पालिका प्रशासनाच्या वतीने ज्या नागरिकांचे दाखले रद्द केले आहेत, त्यांना लेखी नोटीस देण्यात येत आहे. ज्यामध्ये या आदेशामुळे तुमचे दाखले रद्द होत असून, तुम्ही पुन्हा कार्यालयाशी संपर्क साधून नवीन ऑर्डरनुसार पुन्हा अर्ज करून आपला दाखला घेऊन जावा. या प्रक्रियेसाठी त्वरित पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनदेखील करण्यात येत आहे. पत्राला नागरिकांचा प्रतिसाद न आल्यास पुढे त्यांच्या घरी भेट देऊन आवश्यकतेनुसार पुढील प्रक्रिया केली जाईल, असे जन्म-मृत्यू विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

‘ती’ प्रमाणपत्रे रद्द
११ ऑगस्ट २०२३ ते २१ जानेवारी २०२५ या कालावधीत निर्गमित झालेली विशिष्ट प्रमाणपत्रे रद्ध केली आहेत. तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. त्यामुळे प्रमाणपत्रे रद्द झालेल्या नागरिकांना सार्वजनिक आरोग्य विभागाचे १२ मार्च २०२५ च्या शासन निर्णयानुसार फेर अर्जासह कागदपत्रे संबंधित तहसीलदारांकडे पुराव्यानिशी सादर करावी लागणार आहेत. यासाठी फेर अर्जासोबत निर्धारित पुरावे जोडावे लागणार आहेत.

फेर अर्जासाठी आवश्यक पुरावे
फेर अर्जासोबत खालील पुरावे जोडावे लागणार आहेत. यामध्ये जन्माचा पुरावा (रुग्णालयाच्या नोंदी किंवा लसीकरणाचे पुरावे), मृत्यू नोंदणीसाठी शवविच्छेदन अहवाल, प्रथम खबरी अहवाल किंवा रुग्णालयीन कागदपत्रे, शैक्षणिक पुरावे (शाळेच्या प्रवेश-टीसी रजिस्टरचा उतारा, बोनाफाईड प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला). तसेच रहिवासी पुराव्यासाठी मालमत्ता कराची पावती, पाणीपट्टी, वीजबिल, मालमत्ता पुराव्यासाठी सातबारा उतारा, नमुना ८-अ, वारस नोंदीचे फेरफार, मिळकत उतारा, नोंदणीकृत दस्त जोडावे लागतील. ओळख पुराव्यासाठी वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक, पोस्ट ऑफिस पासबुक जोडावे लागणार आहे. कौटुंबिक पुरावा म्हणून परिवारातील सदस्यांचे जन्म प्रमाणपत्र, शिधापत्रिका, विवाह प्रमाणपत्र इत्यादी पुरावे अर्जासोबत सादर करावे लागणार आहे.

जन्म आणि मृत्यूची जी प्रमाणपत्रे तहसीलदार किंवा तालुका दंडाधिकारी या पदापेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी जारी केलेली आहेत, ती प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत आहेत. नागरिकांनी या कार्यालयात पुन्हा अर्ज करून जन्म-मृत्यू अनुपलब्धता प्रमाणपत्र नव्याने प्राप्त करून घ्यावे. तहसीलदार यांच्या आदेशान्वये आदेश पारित केल्यावर पुन्हा जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येतील. पालिका प्रशासनाकडून याविषयी जाहीर नोटीस काढली आहे.
डॉ. प्रतिभा पानपाटील, उपनिबंधक, जन्म-मृत्यू विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi Speech Live Update : पंतप्रधान मोदींकडून लाल किल्ल्यावर ध्वजारोहण, देशाला करणार संबोधित

Independence Day 2025 : पंतप्रधान मोदींचे राजघाटावर महात्मा गांधींना अभिवादन, लाल किल्ल्यावर बाराव्यांदा तिरंगा फडकवणार

Solapur Monsoon Update: साेलापुरला मुसळधार पावसाचा इशारा! 'हिप्परगा तलाव फुल्ल, प्रवाह मंदावला'; सांडव्यातून ४०० क्युसेकचा विसर्ग

Child Daycare Tip: मुलांना डे-केअरमध्ये पाठवताय? तर पालकांनी ह्या प्रकारे घ्या सुरक्षेची काळजी

वेतन अधीक्षकांचे आदेश! ‘ही’ कागदपत्रे नसलेल्या शिक्षकांचा थांबणार पगार; ऑगस्टच्या पगारबिलासोबत मुख्याध्यापकांना जोडावी लागणार सर्वांची कागदपत्रे अपलोड केल्याची प्रत

SCROLL FOR NEXT