वासिंद, ता.१५(बातमीदार): मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर शहापूर-कल्याण तालुक्याला जोडणाऱ्या भातसा नदीवरील गेरेसे पुलाच्या संस्थात्मक परीक्षणाची मागणी मनसेकडून करण्यात आली होती. याच अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच पुलाची पाहणी केली.
शहापूर कल्याण तालुक्याला जोडणाऱ्या गेरसे पुलाच्या दुरवस्थेबाबत ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित झाले होते. शहापूर कल्याण मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागाला जोडणारा एकमेव मार्ग असून टोलनसल्यामुळे मुरबाड वाडा आसनगाव एमआयडीसीमधील बहुतेक अवजड वाहने याच पुलावरून प्रवास करतात. पावसाळ्यात याच पुलामुळे आजूबाजूच्या गाव खेड्यांचा वासिंदच्या बाजारपेठेशी संपर्क टिकून राहतो. तसेच समृद्धी महामार्ग सुरु झाल्यामुळे या रस्त्यावरील वाहनांची रहदारी वाढली आहे. त्यामुळे भविष्यात दुर्घटना घडू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कल्याण शाखेचे उपअभियंता मदन हिरवे, अभियंता सागर पवार यांनी संबंधित पुलाची पाहणी केली. यावेळी भातसा नदीवरील पूल सुस्थितीत आहे. नवीन पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल, अशी माहिती कल्याण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता मदन हिरवे यांनी दिली.
-------------------------
स्फोटके टाकून मासेमारी
पस्तीस वर्षांपूर्वी बांधलेल्या पुलाचे संरक्षक कठडे तुटलेले आहेत. एकाच वेळी दोन्ही बाजूने गाडी आल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते. तसेच या परिसरात स्फोटके टाकून मासेमारी देखील केली जात असल्याने दुर्घटनेची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.