मुंबई

रस्‍त्‍याच्या दुरवस्‍थेमुळे ग्रामस्‍थांची कसरत

CD

रस्‍त्‍याच्या दुरवस्‍थेमुळे ग्रामस्‍थांची कसरत
दहा वर्षांपासून डागडुजीकडे दुर्लक्ष

रोहा, ता. २२ (बातमीदार) ः तालुक्यातील चणेरा भागातील खैरे खुर्द-बिरवाडी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. खड्डेमय रस्त्यावरून पायपीट करताना ग्रामस्‍थांना अक्षरशः कसरत करावी लागते. रस्त्याअभावी रुग्‍ण तसेच गर्भवतींना यातना भोगाव्या लागतात. प्रत्‍येक सरकारकडून निवडणुकांमध्ये नेतेमंडळींकडून आश्‍वासने दिली जातात; मात्र त्‍याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही. दहा वर्षांपासून रखडलेल्‍या रस्‍त्‍याच्या कामाला कधी मुहूर्त लागणार, असा प्रश्‍न ग्रामस्‍थांकडून विचारण्यात येत आहे.
चणेरा ग्रामीण भागात खैरे खुर्द गावात एकमेव मुख्य रस्ता असून तो अनेक गावांना जोडतो. मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने पायपीट करणे अवघड झाले आहे. दहा वर्षांपासून डागडुजी न झाल्‍याने या खड्डे व चिखलमय रस्त्यातूनच शेकडो विद्यार्थी, गर्भवती, रुग्णांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. १० ते १२ वर्षांत रस्त्याची डागडुजी न झाल्याने, रस्‍त्‍यात खड्डे की खड्ड्यात रस्‍ता हेच कळत नाही. पावसाळ्यात रस्त्याला तलावाचे स्‍वरूप येत असल्‍याचे ग्रामस्‍थांचे म्‍हणणे आहे.
रस्त्याअभावी खैरे खुर्द गावासहित तळवडे, चांडगाव, बिरवाडी, आदिवासी पांगलोळी आदी जवळपास सात ते आठ गावांतील नागरिक, विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करून मार्ग काढावा लागतो. विविध पक्षांची नेतेमंडळी या गावांत कार्यक्रमासाठी येत असले तरी रस्‍ता सुस्‍थितीत करण्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत असल्‍याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन धनसे यांनी केला आहे.

ग्रामसडक योजनेंतर्गत कामाला मंजुरी
चणेरा भागातील खैरे खुर्द-बिरवाडीतील नवीन रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव तयार करून संबंधित कार्यालयात सादर केला आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत कामाला मंजुरीही मिळाली आहे. पावसाळ्यानंतर काँक्रीटीकरणाला सुरुवात होईल. हा रस्‍ता खड्डेमय झाला असून निधी उपलब्ध झाल्यास आणि पावसाने उसंत घेतल्यास डागडुजीचे कामदेखील मार्गी लागेल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अनिल जांभळे यांनी दिली.
................

पाली स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता खचला
पाली, ता. २२ (वार्ताहर) ः पावसामुळे पाली बसस्थानकाजवळ अंबा नदीकिनाऱ्यालगतचा स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता ओव्हळाच्या बाजूने खचला आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे रस्त्याच्या कडेची माती वाहून गेली. रस्ता खचल्यामुळे आता या ठिकाणाहून प्रवास करणे धोकादायक व जिकिरीचे झाले आहे. त्यामुळे नगर पंचायतीने लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी व ओव्हळाच्या बाजूने कठडा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

अतिवृष्टीमुळे व पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ओव्हळाची माती वाहून गेली आहे. त्यामुळे रस्ता खचला आहे. नगर पंचायतीमार्फत लागलीच रस्त्याची दुरुस्ती करण्यात येईल.
- सुलतान बेनसेकर, बांधकाम सभापती, नगर पंचायत पाली

पाली ः स्‍मशानभूमीकडे जाणारा रस्ता ओव्हळाच्या बाजूने खचला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli west Building incident : मोठी बातमी! डोंबिवली पश्चिमेतील 25 कुटुंब राहत असलेली चार मजली इमारत खचली!

Rahul Gandhi and Mallikarjun Kharge: ...म्हणून यंदा राहुल गांधी अन् खर्गे लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला गेले नाहीत!

Lionel Messi चा तीन दिवसीय भारत दौरा, मुंबईत वानखेडेसह ब्रेबॉनवरही खेळणार, कधी आणि केव्हा? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Love Jihad : हैदाराबादेत 'लव्ह जिहाद'चं प्रकरण उघडकीस; मूळचा पाकिस्तानी असणाऱ्या भामट्याने हिंदू मुलीला फसवलं अन्...

Maharashtra Rain Alert: पुढील दिवस महत्त्वाचे! मुंबईला मुसळधारेचा इशारा, महाराष्ट्रात कसे असेल हवामान?

SCROLL FOR NEXT