तुर्भे, ता. २ (बातमीदार) : सर्वत्र पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे बाजारात पावसाळी फळांची रेलचेल वाढली आहे. बाजारात लाल चुटुक चेरी, लाल रंगाचे आलू बुखार, ओले लाल-पिवळे खजूर, लिची प्लम यांसारख्या फळांनी बाजारपेठ भरून गेली आहे. बहुतांशी फळांचा रंग लाल असल्याने बाजारात लाल रंग सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की चेरी, ओले खजूर आदी फळे बाजारात दिसू लागतात. यावर्षी पावसाळा लवकरच सुरू झाला आहे. त्यामुळे या पावसाळी फळांचे उत्पादन चांगले झाले आहे. परिणामी मुंबईच्या बाजारपेठेत ही फळे दाखल झाली आहेत. चवीला आंबट-गोड असणाऱ्या या फळांमध्ये क जीवनसत्त्व अधिक असते. त्यामुळे पावसाळ्यात त्यांना चांगली मागणी असते. आता या फळांची आवक सुरू झाली असल्याने त्यांचे भाव काहीसे वाढीव आहेत; मात्र आवक जास्त वाढल्यानंतर भाव आणखी खाली येण्याची शक्यता व्यापारी रामबाशिष्ट जयस्वाल यांनी व्यक्त केली आहे.
----------
फळांचे किलोनुसार भाव
काश्मीरहून येणारी चेरी सध्या बाजारात २०० ते ३०० रुपये किलो भावाने विकली जात आहेत; तर बिहारच्या लिचीचा १२ ते १५ किलोचा बॉक्स दीड हजाराच्या घरात आहे. गुजरातवरून येणारे खजूर १०० ते १२० रुपये किलो आहेत; तर काश्मीरचे प्लम २०० ते ४०० रुपये किलो आहेत. आंबट-गोड आलू बुखारच्या पाच किलोच्या बॉक्सची किंमत ८०० ते १००० रुपये आहे. किरकोळ बाजारात ही फळे २०० ते ४०० रुपये किलोच्या घरात आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.