वाशी, ता. २ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारमार्फत ‘स्वच्छ भारत मिशन’ ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियान सुरू केले आहे. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या उपस्थितीत सारसोळे येथील शाळा क्रमांक ९२ व १२१ येथे विशेष कार्यक्रमात अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या अभियानात विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांना स्वच्छतेचे व आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
जीवनात आरोग्याचे महत्त्व सर्वाधिक असून, त्या दृष्टीने अनारोग्य टाळण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यादृष्टीने ‘स्वच्छता अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानाचा शुभारंभ हा देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सहभागातून करण्यात आला असल्याचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. या वेळी त्यांनी वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता, प्लॅस्टिक प्रतिबंध, वृक्षारोपण संवर्धन या बाबी लक्षात घेऊन अभियानांतर्गत संपूर्ण जुलै महिन्यात विविध स्वच्छता व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. कोणताही उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही, हे लक्षात घेऊन संपूर्ण महिनाभर अभियानअंतर्गत नियोजन केलेल्या उपक्रमामध्ये नागरिकांच्या सहभागावर भर देण्यात येत असून, त्यामध्ये प्राधान्याने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व व त्या माध्यमातून आरोग्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, घनकचरा व्यवस्थापन विभाग परिमंडळ एकचे उपायुक्त डॉ. अजय गडदे व परिमंडळ दोनचे उपायुक्त स्मिता काळे, उपायुक्त सोमनाथ पोटरे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर व इतर अधिकारी उपस्थित होते.
------------------
प्रदर्शनाद्वारे पावसाळी आजारांची माहिती
नवी मुंबई महापालिकेच्या सारसोळे येथील शाळा क्रमांक ९२ व १२१ व नेरूळमधील विद्याभवन शाळांमध्ये अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ अभियानाच्या अनुषंगाने स्वच्छता व आरोग्याची काळजी घेण्याविषयी माहिती असलेली माहितीपत्रके प्रदान करण्यात आली. पावसाळी कालावधी लक्षात घेता कीटकजन्य आजार रोखण्यासाठी घरात व परिसरात डास उत्पत्ती होऊ नये याकरिता घ्यावयाची खबरदारी याबाबत प्रदर्शन मांडण्यात आले होते.
------------------
‘सफाई अपनाओ, बिमारी भगाओ’ या अभियानअंतर्गत शाळांप्रमाणेच रुणालये, उद्याने या ठिकाणीही विविध उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले. यापुढे जुलै महिन्याच्या अभियान कालावधीत संपूर्ण नवी मुंबई महापालिका क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम राबविण्यात येत असून, त्यामध्ये सर्व नागरिक, विद्यार्थी, विविध स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्था व इतर संस्था प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.