आजपासून वाहतूक कोंडीला लगाम
पालिकेने सिग्नल यंत्रणा केली कार्यान्वित!
बदलापूर, ता. २ (बातमीदार) : शहरातील वाहतूक कोंडीला आता लगाम लागणार आहे. शहरातील प्रमुख चौक व मुख्य रस्त्यांवर पालिकेकडून उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा मंगळवारी (ता. १) कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे कोंडीने त्रस्त झालेल्या चालकांना दिलासा मिळाला आहे.
बदलापूर शहरात लोकसंख्या वाढत आहे, त्या तुलनेत वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौक परिसर, मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडीचा त्रास वाहनचालक आणि त्याचबरोबर वाहतूक पोलिसांनादेखील सहन करावा लागत होता. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी शहरातील वाहतूक कोंडी होत असलेल्या चौक आणि मुख्य रस्त्यांची पाहणी करत संबंधित रस्ते रुंद केले. तसेच रस्त्यातील काही झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण केले. तसेच विजेचे मोठे खांब स्थलांतरित केले. आता या ठिकाणी सिग्नल यंत्रणा लावून प्रायोगिक तत्त्वावर त्यांची चाचणी करत अखेर मंगळवारपासून ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
बदलापूर पूर्वेकडील कात्रप, मॅक्डीजवळचा चौक, शिरगाव रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार, पश्चिमेला वडवली चौक, समर्थ चौक सानेवाडी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असे. त्यामुळे या ठिकाणी सिग्नल यंत्रणा सुरू झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.