मुंबई

भातपिकांना शंखी गोगलगायीचा धोका

CD

शहापूर, ता. २ (वार्ताहर) : सध्या खरीप हंगामासाठी बळीराजाची भातलावणीची लगबग सुरू आहे. चांगले पीक येण्यासाठी अनेक उपाययोजना शेतकरी करत आहेत. परंतु, मे महिन्यापासून पाऊस सुरू राहिल्याने जमिनीत जास्त काळ आद्रता आणि ओलावा राहिला आहे. परिणामी, तालुक्यात अनेक ठिकाणी शंखी गोगलगायचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. हा प्रादुर्भाव अधिक वाढू नये, यासाठी उपाययोजना आखण्याचे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

शहापूर तालुक्यात मागील वर्षापासून शंखी गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. शंखी गोगलगायचा जीवनक्रम अंडी, पिल्ले आणि प्रौढ अशा तीन अवस्थांमध्ये पूर्ण होतो. अंडी देण्याचे अधिक प्रमाण आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोगलगायीचा जन्म होतो. या गोगलगाय रात्रीच्या वेळी पानांना, फुलांना अनियमित व मोठ्या आकाराची छिद्र पाडून पानांच्या कडा खातात. काही प्रमाणात झाडांच्या शेंगा, फळे, कोवळ्या सालीवरही उपजीविका करून पिकांचे नुकसान करतात. गोगलगायींचे प्रामुख्याने लक्ष रोप अवस्थेतील पिकांवर असते. या अवस्थेत रोपांची शेंडे कुरतडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
ओढे, नाले, कालवे आणि नदीकाठच्या जमिनींतील पिकांना शंखी गोगलगायी धोका अधिक आहे. भातपिकांना याचा फटका बसण्याची जास्त शक्यता आहे. शंखी गोगलगायीचा धोका हा प्रामुखाने पिकांची उगवण सुरू झाल्यानंतर होतो. उगवून आलेली पिकांची पाने कुरतडल्यामुळे पिकांची वाढ खुंटते. तरी गावपातळीवर कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांमध्ये प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टिकोनातून जनजागृती करण्यात येत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी मेटाल्डिहाईड या औषधी संपूर्ण शेतीभोवती टाकून शंखी गोगलगाय मारल्या जातात.

या कराव्यात उपाययोजना
झाडावर लपलेल्या गोगलगाय हाताने गोळा करून साबणाच्या प्रावणात बुडवाव्यात आणि खड्ड्यात पुरुरून टाकाव्यात किंवा रॉकेलमिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात. गोगलगाय आकर्षित होण्यासाठी गोणपाट गुळाच्या पाण्याच्या प्रावणात बुडवून संध्याकाळी शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. सकाळी सूर्योदयानंतर त्या पोत्याखाली गोळा झालेल्या गोगलगाय जमा करून नष्ट कराव्यात. गोगलगाय जमा करताना हातमोजे व तोंडावर मास्क घालावा.

भातबियाण्यांची पेरणी पूर्ण
शहापूर तालुक्यात १४९२ हेक्टर क्षेत्रात भातबियाण्यांची पेरणी पूर्ण झाली आहे. नागळीची १४६ हेक्टर क्षेत्रात पेरणी, तर वरईची १५९.७० हेक्टरवर केली आहे. एसआरपी अर्थात वाफा पद्धतीने १२८ हेक्टर क्षेत्रात भाताची पेरणी झाली आहे. भाताची फेरपेरणी १७ हेक्टर क्षेत्रात झाली आहे. यावर्षी भात रोपांच्या लागवडीचे ९५ टक्के उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.


शेतात शंखी गोगलगायचा धोका वाढत आहे. या गोगलगाय दिसताच कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- राजाराम खाडे, कृषी पर्यवेक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT