मुंबई

पावसाचा जोर नसल्याने शेतकरी चिंतेत

CD

वाडा, ता. १२ (बातमीदार) : तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाचा जोर नसल्याने माळरानावरील हळवार भातशेतीची लावणी पाण्याअभावी रखडली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

माळरानावरील हळवार भातशेती ही पावसावरच अवलंबून असते. हळवार भातपीक हे १०० ते ११० दिवसांत तयार होणारे असून, त्याच्या रोपाची लागवड किमान २१ दिवसांत होणे अपेक्षित असते. वाडा तालुक्यात समृद्धी, शतक, राशीपूनम, सुदंर, कर्जत-३, एमटीयू-१०-१० डांगी या हळवार भात वाणांची लागवड शेतकरी मोठ्या प्रमाणावर करीत आहेत.

पावसाने सुरुवात दमदार केली असली तरी सध्या त्याचा जोर आवश्यक प्रमाणात नसल्याने हळवी शेतीलागवड करण्यासाठी शेतकरी आटापिटा करीत आहेत. काही शेतकरी चक्क मोटार लावून पाणी उपसा करून लावणी करीत असल्याचे चित्र आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पावसाचा काही नेम राहिला नसल्याने वाडा तालुक्यात सध्या गरवी भातशेतीच्या तुलनेत हळवार भातशेती जास्त प्रमाणात केली जाते. यात मोठे क्षेत्र वनपट्ट्यात येत असून, रानमाळासह डोंगरदऱ्यातही मोठ्या प्रमाणावर हळवार भातपिकाची लावणी केली जाते.

पावसाशिवाय या भागात लावणी शक्य नाही. सध्या पावसाचा जोर नाही. ऐनवेळी पावसाने दगा दिल्याने रोपांची पुनर्लागवड करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने हळवार भातपिकाची शेती लावायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे. सध्या हळवार भातपीक लावणीयोग्य पाऊस पडत नसल्याने भातरोपे तयार असूनदेखील पाण्याअभावी लावणी करता येत नाही. यावर्षी हळवार शेती ओस पडण्याची वेळ ओढावणार, अशी भीती कोंढले येथील शेतकरी प्रभाकर पाटील यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: बुमराहशी जो नडला, त्याला आम्ही गाडला! शुभमन गिल अन् झॅक क्रॉली यांच्यात बाचाबाची, काय घडलं? Video

IND vs ENG 3rd Test: भारताकडे '०' धावांची आघाडी; ११ धावांत गमावले ४ बळी, कसोटीत असे केव्हा घडले अन् निकाल काय लागला होता?

Sanjay Gaikwad Imtiaz Jaleel Clash: ‘’तुला तर असं मारेन..असं मारेन की, परत तू...’’ ; संजय गायकवाडांनी आता इम्तियाज जलील यांना भरला दम!

'मला भारताकडून पुन्हा कसोटी क्रिकेट खेळायचे आहे'; अजिंक्य रहाणेची मन की बात! इंग्लंडमधून निवड समितीला पाठवला मॅसेज

IND vs ENG 3rd Test: भारताने ५० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! रवींद्र जडेजा थेट गॅरी सोबर्स यांच्या पंक्तीत बसला, जगात दोघंच खेळाडू असे करू शकलेत

SCROLL FOR NEXT