मुंबई

वर्सोवा येथे खा-या पाण्याचे गोडे पाणी करण्याचा प्रकल्प पालिका उभारणार

CD

मालाडनंतर वर्सोव्यातही
निःक्षारीकरण प्रकल्प
मुंबई पालिकेने मागवले स्वारस्य पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ ः मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि त्यानुसार वाढणारी पाण्याची मागणी लक्षात घेता, समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून गोडे पाणी मिळवण्यासाठी आता अंधेरीच्या वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर निःक्षारीकरण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने संबंधित क्षेत्रातील कंपन्यांकडून स्वारस्य पत्र मागवली आहेत.
लोकसंख्येनुसार सध्या किमान पाच हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज आहे. मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज ३,९५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यातही दररोज होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील ३४ टक्के पाणी चोरी आणि गळती यातून वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याची कमतरता भासते. त्यासाठी गारगाई, पिंजाळ, दमणगंगा हे धरण प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने समुद्राचे खारे पाणी गोडे करण्यासाठी नवा प्रकल्प उभारण्याची योजना आखली. त्यासाठी महापालिकेला तीन हजार ५२० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पापाठोपाठ आता वर्सोवा प्रकल्प पालिकेने हाती घेतला आहे.
---
पाणीप्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
वर्सोवा प्रकल्पासाठी ‘डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट अँड ट्रान्स्फर’ मॉडेलच्या आधारे इच्छुक कंपन्यांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. मुंबई महापालिका गारगाईसारख्या पर्यायी प्रकल्पांसोबतच, निःक्षारीकरणाद्वारे समुद्रातूनच गोड्या पाण्याची प्राप्ती करून पाण्याची समस्या सोडवण्याच्या दिशेने गंभीरपणे प्रयत्नशील आहे. वर्सोवा प्रकल्पही या वाटचालीतील एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India reaction on Trump tariff: ट्रम्प यांनी भारतीय वस्तूंवर फोडलेल्या टॅरिफ बॉम्बनंतर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका!

Jaya Bachchan warn Priyanka Chaturvedi: जया बच्चन राज्यसभेत बोलताना अचानक शेजारीच बसलेल्या प्रियंका चतुर्वेदींवर उखडल्या, म्हणाल्या...

Trumps Tariff Bomb: ट्रम्प 'टॅरिफ'मुळे भारताच्या टेक्सटाईल्स, फार्मासह 'या' ५ उद्योगांना बसणार फटका, पाहा संपूर्ण लिस्ट

Amit Shah Rajya Sabha Speech: ‘माझ्याशी तर निपटा, पंतप्रधानांना कशाला बोलावताय, आणखी त्रास होईल’’

Prakash Solanke: प्रकाश सोळंकेंनी गळाला लावलेले बाबरी मुंडे नेमके कोण? पंकजांसह धनंजय मुंडेंना जबरदस्त धक्का!

SCROLL FOR NEXT