मुंबई

महिला सक्षमीकरण कागदावरच

CD

शीतर मोरे : सकाळ वृत्तसेवा
अंबरनाथ, ता. १८ : महिला सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या बचत गट योजनेचा अंबरनाथमध्ये केवळ नावापुरताच गाजावाजा होत आहे. प्रत्यक्षात अनेक बचत गटांच्या महिलांना कामच मिळत नाही. स्वयंसहाय्यता गटांच्या बैठकीत योजना, कर्ज, प्रशिक्षण यांच्या घोषणा होतात. मात्र, बाजारपेठेपर्यंत पोहोचणारी संधी मिळत नसल्याने महिलांचा उत्साह कमी होत चालला आहे. काही मर्जीतल्या बचत गटांच्या महिलांनाच पालिकेच्या उपक्रमात संधी दिली जात असल्याची टीका होत आहे.
अंबरनाथमध्ये शासकीय धोरणानुसार महिला सक्षमीकरणासाठी महिला विभागप्रमुख पौर्णिमा आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली सुमारे ९७१ बचत गट करण्यात आले आहेत. या महिलांना घरगुती व्यवसायातून स्वावलंबी आणि आपला उदरनिर्वाह करण्यासाठी बचत गटामार्फत प्रशिक्षण दिले जाते. बचत आणि बचतीमधून स्वयं रोजगार मिळवून देण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते. महिला सक्षमीकरणातून घरगुती व्यवसाय करता यावा, यासाठी अनेकांनी विणकाम, शिवणकाम, मसाले, पापड, फॅन्सी वस्तू तयार करण्याचा उद्योग सुरू केला. मात्र, विक्रीसाठी योग्य ठिकाण, सरकारी आदेश किंवा नगरपालिकेकडून प्रोत्साहन न मिळाल्याने तयार माल घरात पडून राहत आहे. काही गटांनी तर आर्थिक तोटा टाळण्यासाठी कामच बंद केले आहे.
हर घर तिरंगा उपक्रमात पाच ते सहा बचत गट सहभागी झाले होते. त्यांनी हस्तकलेच्या वस्तू, रांगोळी स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम पालिकेच्या आवारात सादर केले. उर्वरित गट कुठेही दिसले नाही. त्यामुळे ९७१ गटांपैकी सहा गटांनी सहभाग घेतला. पाच वर्षांपासून काही मर्जीतल्या बचत गटांनाच पालिकेच्या उपक्रमात सहभागी केले जाते. इतर महिलांना कोणत्याही प्रकारची संधी दिली जात नाही. पालिकेचे कार्यक्रम हे फक्त फोटो काढण्यासाठी असतात. प्रत्यक्षात रोजगार किंवा संधी मिळत नसल्याची खंत काही महिलांनी नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त केली.

स्वावलंबनाचे स्वप्न धूसर
महिला बचत गट हे केवळ ‘स्पर्धा’ आणि ‘उत्सवातील स्टॉल’पुरतेच मर्यादित राहिले आहेत. नियमित उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण न झाल्याने स्वावलंबनाचे स्वप्न धूसर झाले आहे. फक्त फोटो काढून समाजमाध्यमांवर टाकण्यापेक्षा प्रत्यक्ष रोजगार द्यावा, अशी महिलांची मागणी आहे. बचत गट योजना ‘सक्षमीकरण’ नव्हे तर ‘प्रतीक्षा’चा खेळ ठरल्याची कुजबुज अंबरनाथच्या गल्लीबोळात सुरू आहे.

हक्काच्या बाजारपेठेचा अभाव
प्रशिक्षण दिले तरी तयार उत्पादन विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध नसल्याने महिलांचा उत्साह कमी होत आहे. अनेक बचत गटांनी कर्ज घेतले; परंतु व्यवसाय सुरू करण्यास बाजारपेठ व आर्थिक सल्ल्याचा अभाव जाणवतो. महिलांना निव्वळ कर्ज दिले. त्यांना मार्गदर्शन अथवा संवाद साधला जात नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

ज्या महिलांना संधी मिळत नाही, त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन अडचणी सांगाव्या. त्यांच्या अडचणी समजून त्यावर नक्कीच उपाययोजना केली जाईल.
- उमाकांत गायकवाड, मुख्याधिकारी

९७१ महिला बचत गट आहेत. प्रत्येक गटात १० ते १२ महिलांचा समावेश आहे. प्रत्येकीला खासगीत माहिती देणे शक्य नसल्याने व्हॉट्सॲपवर संपर्क साधला जात आहे. त्याद्वारे प्रत्येक उपक्रमांची माहिती दिली जाते. ज्या महिलांना इच्छा असते, त्या स्वखुशीने संपर्क साधून उपक्रमामध्ये सहभाग घेतात. अद्यापही एकाही महिलेची तक्रार आमच्यापर्यंत आली नाही. महिलांनी तक्रार केल्यास त्यांची दखल घेतली जाईल.
- पौर्णिमा आव्हाड, महिला विभागप्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT