मुंबई

कचऱ्याचा डोंगर, नागरिकांचा संताप

CD

कचऱ्याचा डोंगर, नागरिकांचा संताप
कोपरखैरणे व घणसोलीतील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न गंभीर
नवी मुंबई, ता. १८ (बातमीदार) ः कोपरखैरणे आणि घणसोली परिसरात कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारा टनवारी कचरा योग्य पद्धतीने उचलला जात नाही. परिणामी, अनेक ठिकाणी डम्पिंग ग्राउंडसारखी स्थिती निर्माण झाली असून, दुर्गंधी, माशा आणि डासांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
विशेषत: घणसोली एमआयडीसीजवळ व कोपरखैरणेत कचऱ्याचे ढीग दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना श्वसनासंबंधी त्रास होत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महापालिका वारंवार आश्वासन देते, पण प्रत्यक्षात परिस्थितीत सुधारणा होत नाही, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
महापालिकेने घरगुती कचऱ्याचे विभाजन, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प यावर जोर द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे, तर पर्यावरणप्रेमींनीही या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केले आहे अन्यथा आरोग्यविषयक आजारांचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला आहे. कोपरखैरणे व घणसोलीसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागात स्वच्छता ही मूलभूत गरज असताना कचऱ्याचा प्रश्न कायम राहणे, ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT