जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १८ : अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्यांना तातडीची मदत मिळून त्यांचे योग्य पुनर्वसन व्हावे, यासाठी ठोस आणि प्रभावी पावले उचलली जात आहेत. राज्य सरकार व जिल्हा प्रशासन नागरिकांच्या सुरक्षेसाठी वचनबद्ध असल्याचे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.
ठाणे-मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील नियंत्रण कक्षात सविस्तर बैठक झाली. या वेळी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामधून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार संजय केळकर यांनी या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत जिल्ह्यातील आपत्ती परिस्थिती हाताळण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना, विभागांमधील समन्वय, तातडीच्या सेवा उपलब्धतेबाबतची तयारी तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवण्याचे, बचाव पथके व साधनसामग्री तात्काळ उपलब्ध करून देण्याचे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.