पालघर, ता. १ (बातमीदार) ः जिल्ह्यामध्ये २७ व २८ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले होते. अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले असून, त्यांचे आर्थिक नुकसान प्रचंड आहे. यासंदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तत्काळ मदतीसाठी लेखी मागणी केली आहे. पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्यात यावे, शेतकरी आणि नागरिकांना तातडीने आर्थिक मदत, तसेच पुनर्वसनाची सुविधा पुरवावी, आवश्यक तरतुदी करून मदतकार्य जलदगतीने सुरू करावे, प्रभावित भागात आरोग्य सुविधा, अन्नपाणी, निवारा व पुनर्वसनासाठी आवश्यक उपाय त्वरित राबवावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांमुळे राज्य प्रशासनाला प्रभावित भागांमध्ये जलद मदतकार्य सुरू करण्यास चालना मिळेल, तसेच शेतकरी व नागरिकांना त्वरित आर्थिक मदत मिळू शकेल, असा विश्वास डॉ. सवरा यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.