मुंबईकरांना मुबलक पाण्याचा साठा
मुसळधार पावसामुळे दिलासा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १ ः वर्षभराची पाण्याची गरज भागवण्यासाठी आवश्यक असलेला पाणीसाठा यंदा मुबलक प्रमाणात जमा झाला आहे. बुधवारी (ता. १) सकाळी घेण्यात आलेल्या नोंदीनुसार मुंबईला पाणी पुरवणाऱ्या सात तलावांमध्ये एकूण १४ लाख २८ हजार ५४९ दशलक्ष लिटर (९८.७० टक्के) पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा ३५९ दिवसांसाठी पुरेसा असून, मुंबईकरांना पाणीकपातीशिवाय वर्षभर पुरवठा शक्य होणार आहे.
यंदा जुलै महिन्यापासूनच धरण क्षेत्रात मागील दोन वर्षांच्या तुलनेत दुप्पट पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्येच बहुतांश तलाव काठोकाठ भरले आहेत. काही वेळा धरणाचे दरवाजे उघडून अतिरिक्त पाणी सोडावे लागले. तथापि, सप्टेंबर अखेरीस काही दिवस पाऊस न झाल्याने साठ्यात किंचित घट झाली. २७ सप्टेंबर रोजी पाणीसाठा ९९.१३ टक्के होता, तो घटून १ ऑक्टोबर रोजी ९८.७० टक्के इतका झाला आहे.
पावसाळ्यापूर्वी पाणीपातळी घटली होती, मात्र पाणीकपात लागू न करता मुंबईला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात आला. यंदा पावसाळ्यात अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याने मुंबईकरांना आगामी वर्षात पाणीकपातीचा फटका बसणार नाही, ही दिलासादायक बाब आहे.
मागील तीन वर्षांचा तुलनात्मक पाणीसाठा
२०२५ : ९८.७० टक्के (१४,२८,५४९ दशलक्ष लिटर)
२०२४ : ९९.३७ टक्के (१४,३८,२२७ दशलक्ष लिटर)
२०२३ : ९९.१८ टक्के (१४,३५,४५९ दशलक्ष लिटर)
.........
सात तलावांतील पाणीसाठा (१ ऑक्टोबर रोजी)
अप्पर वैतरणा : २,२६,०८३ दशलक्ष लिटर – ९९.५८ टक्के
मोडक सागर : १,२८,९२५ दशलक्ष लिटर – १०० टक्के
तानसा : १,४३,२९९ दशलक्ष लिटर – ९८.७७ टक्के
मध्य वैतरणा : १,९२,८२५ दशलक्ष लिटर – ९९.६४ टक्के
भातसा : ७,०१,६७३ दशलक्ष लिटर – ९७.८६ टक्के
विहार : २७,६९८ दशलक्ष लिटर – १०० टक्के
तुळशी : ८,०४६ दशलक्ष लिटर – १०० टक्के
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.