शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात?
दीडशे हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान
टिटवाळा, ता. ७ (वार्ताहर) : गेल्या काही दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दिवाळीवर मोठे संकट आले आहे. जाचकवाडी, बेलवली, वडवली, हनुमाननगर यांसह अनेक परिसरातील सुमारे १५० हेक्टर क्षेत्रातील भातपिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची मागणी कृषी विभागाकडे केली आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप पंचनाम्यासाठी कोणतीही हालचाल न केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.ग्रामीण भागातील शेतकरी मंडळींच्या म्हणण्यानुसार, दिवाळीच्या उंबरठ्यावर शेती उद्ध्वस्त झाल्याने सण साजरा करण्याचा प्रश्नच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, स्थानिक लोकप्रतिनिधींनी तालुका प्रशासनाकडे तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी, अशी मागणी केली आहे. प्रशासनाने त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.
पाणी निचरा होण्यास अडथळा: सलग पाऊस झाल्यामुळे शेतीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्यने शेतात पाणी साचून राहिले. परिणामी भाताचे रोप कुजले आहे. अनेक ठिकाणी पिके जमिनीवर पडून नष्ट झाली आहेत. पिके पाण्याखाली गेल्याने शेतांमध्ये चिखलाचे थर जमा झाले आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुमारे दीडशे हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.