पावसाच्या उघडीपमुळे चौल-रेवदंडामधील जनजीवन सुरळीत
रेवदंडा, ता. २ (बातमीदार) ः मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाने चौल-रेवदंडा परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. नवरात्रोत्सवदेखील अक्षरशः पाण्यात गेल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती, मात्र दोन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला असून, बाजारपेठेत चैतन्य परतले होते.
सततच्या पावसामुळे शेतांमध्ये अजूनही पाणी साठल्याने भाताच्या लोंब्या पाण्यात डोलताना दिसून येत होत्या. दसऱ्याच्या निमित्ताने या लोंब्यांना मोठी मागणी असते. दुसरीकडे नारळ व सुपारी बागायतींमध्ये पावसानंतर पाडेकरी वर्गाची हालचाल सुरू झाली होती. काही ठिकाणी सुपारीचे पाडे पाडण्याचे काम सुरू झाले. यंदा पावसाचा जोर कमी न झाल्यामुळे अनेक बागायतदारांना आवश्यक फवारणी करता आली नाही. परिणामी सुपारी पिकावर कोळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. बागायतदार राजेश मुकादम यांनी सांगितले की, पावसाने थोडी उसंत दिल्यामुळे सुपारी पाडण्याच्या कामाने गती घेतली आहे. सध्या पावसाने दिलेल्या थोड्याशा विश्रांतीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा गजबजल्या होत्या. मोठ्या प्रमाणात बाजारात खरेदी-विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.