Nitin-Gadkari
Nitin-Gadkari 
मुंबई

‘आरे’तील वृक्षतोड अपरिहार्य - नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईकरांना खडड्‌यांपासून मुक्‍ती हवी असेल, तर सिमेंट रस्त्यांचा मार्ग स्वीकारावा, असा सल्ला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. पर्यावरण आणि विकास यात समतोल हवा, असे मत व्यक्‍त करीत ‘आरे’तील वृक्षतोड अपरिहार्य असल्याचे मत त्यांनी व्यक्‍त केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चालवलेली वृक्ष लागवड मोहीम जगाच्या कौतुकाचा विषय झाली असताना काही वृक्ष तोडावे लागत असतील, तर त्याबदल्यात भरपाई करण्याचे धोरण शासन स्वीकारेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला. मोदी सरकार-२ मधील पहिल्या १०० दिवसांचा लेखाजोखा देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रपरिषदेत ते बोलत होते. 

रोजगारनिर्मिती ही आमच्या सरकारची प्राथमिकता आहे, जागतिक मंदीचे परिणाम अमेरिका चीनलाही जाणवत आहेत, ते भारतालाही थोड्याफार प्रमाणात जाणवतील, असे नमूद करतानाच त्यांनी या वातावरणातून देशाला बाहेर काढण्यासाठी पायाभूत योजनांवर; तसेच रोजगारनिर्मिती करणाऱ्या प्रत्येक बाबीवर लक्ष केंद्रित करण्याचा सरकारचा मनोदय त्यांनी स्पष्ट केला.

दरम्यान, प्रतिकूल हवामानामुळे सोमवारी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचे विमान मुंबई विमानतळावर उतरण्यास तब्बल दीड तास उशीर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT