मुंबई

विद्यर्थ्यांच्या मदतीने धोकादायक वळण दर्शविण्यासाठी जुन्या टायरचा वापर

अच्युत पाटील

बोर्डी  - महामार्ग अथवा ग्रामीण भागात वाहनांचा सुळसुळाट वाढला आहे. त्याच सोबत वाढलेले अपघात चिंतेचा विषय आहे. रस्ते अपघातात वर्षाकाठी हजारो लोकांचा बळी जातो. मात्र रस्ते विकास करणाऱ्या कंपन्या आणि सार्वजनीक बांधकाम खाते यातून धडे घेताना दिसत नाही. किंबहुना, पुढे धोकादायक वळण आहे किंव्हा पुढे अपघात प्रणव क्षेत्र आहे. वाहने सावकाश चालवा अशा प्रकारच्या जाहगरातीचे बॅनर लावून आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्यत धन्यता मानतात.

मात्र आता वेगवेगळ्या सामाजीक संघटनांनी या विषयावर गांभिर्याने लक्ष घातल्याचे आढळून येते आहे. डहाणु येथील एस.आर.करंदिकर विज्ञान महाविद्यालय संचलीत बिझनेस मॅनेजमेंट प्रशिक्षण अभ्यासक्रम विभागाच्या संचालिका यांनी ज्ञान भरती सोसायटीच्या माध्यमातून आपल्या विद्यर्थ्यांच्या मदतीने डहाणू परिसरातील जुने टायर गोळा करून स्वच्छ साफ करून रंगरंगोटी लावून धोकादायक वळण किंव्हा अपघात प्रणव क्षेत्रात प्रायोगिक तत्वावर लावण्याचा प्रयोग सुरू केला आहे.

डहाणु परिसरातील नागरीकांनी या उपक्रमाचे भरभरुन कौतूक केले आहे. किंबहुना डहाणू नगर परिषदेने या कामी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. सदर उपक्रम राबविताना बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रम शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रचार्य, तसेत डहाणु मधिल त्रिमुर्ती ट्रांसपोर्ट, ज्योती टायर, धनलक्ष्मी टायर विक्रेत्यांनी भरीव योगदान दिले आहे. टायर लावण्यासाठी तांत्रिक कामाची जबाबदारी कारखानदार अजित नन्नरे यांनी घेतली आहे.

प्राचार्या दिपा तन्ना यांचा कोट- चिंचणी डहणु खाडी सागरी महामार्गावरुन डहाणु कडे येताना वहान चालकांना समोरील वळणाचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात होत असतं या विषयाचे गांभिर्य लक्षात घेऊन आम योगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या पुढे विविध ठिकाणी जाऊन आमचा उपक्रम सुरू ठेवण्याचा प्रयत्न राहणार आहे.

हरबंन्ससिंग नन्नरे -मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील चारोटी, मेंढवण भागात अनेक अपघात होतात. आय.आर.बी या विषयी गंभिर नाही याची आम्हाला खंत वाटते. राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने परवानगी दिल्यास हख उपक्रम महामार्गावर देखिल राबवण्यासाठी मदत करु असे मानव अधिकार परिषदेचे अध्यक्ष आणि वाहतुकदार संघटनेचे नेते हरबंन्ससिंग नन्नारे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

SCROLL FOR NEXT