जव्हारमध्ये पावसामुळे कोसळलेली घराची भिंत.
जव्हारमध्ये पावसामुळे कोसळलेली घराची भिंत. 
मुंबई

पावसामुळे भिंत कोसळून कुटुंब रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा

जव्हार (बातमीदार) ः जव्हार तालुक्‍यात पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक ठिकाणचे रस्ते, मोऱ्या वाहून गेल्या आहेत; तर अनेक गावांतील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. गुरुवारी (ता.1) रात्री बाराच्या सुमारास जव्हार तालुक्‍यातील जळविहिरा गावातील रघुनाथ भोये यांच्या घराची भिंत कोसळली. भोये यांच्या घराचा पायाच दबल्याने संपूर्ण घराला तडे गेले आहेत. त्यामुळे घराचे नुकसान झाले असून आता राहायचे कुठे, असा प्रश्‍न भोये कुटुंबासमोर आहे. 

तालुक्‍यात काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळित झाले आहे. पावसामुळे तालुक्‍यातील अनेक खेड्यात वीज, रस्ते नाहीसे झाले आहेत. वाहतूकही ठप्प आहे. गुरुवारी जयराम भोये यांच्या घराची भिंत कोसळली. रात्री वारा आणि पावसाचा जोर खूप होता. आम्ही सर्व जण घरात झोपेत असताना जोरदार आवाज आला. उठल्यावर घराची भिंत कोसळल्याचे लक्षात आले. घराचा पाया दबला असून संपूर्ण घराला मोठमोठे तडे गेले आहेत, असे भोये यांनी सांगितले. 

भिंतीला ताडपत्रीचा आधार 
पाऊस सतत सुरूच असल्यामुळे पडलेल्या भिंतीला ताडपत्रीचा आधार दिला आहे. कुटुंब वाचले असले, तरी घराचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंब रस्त्यावर आले असून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे, असे रघुनाथ भाये यांनी सांगितले. दरम्यान, देहेरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गरजे यांनी घराच्या नुकसानीची पाहणी करून तलाठी आणि तहसीलदारांना अहवाल देणार असल्याचे सांगितले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT