फोटो
फोटो 
नांदेड

रब्बी पिकांसाठी पाणीपाळी सोडली : आ. कल्याणकर

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड (उत्तर) विधानसभा मतदार संघातील २५ ते ३० गावातील शेतकऱ्यांना शनिवारी (ता. ३०) अखेर दिलासा मिळाला असून शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मागणीची दखल घेवून पिकांसाठी चौथ्या आवर्तनातील पाणीपाळी सोडण्यात आली आहे. या पाणीपाळीचे आ. कल्याणकर यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.

नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातील २५ ते ३० गावातील शेती पूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून आहे. यापूर्वी दोन रब्बी व तिन उन्हाळी अशा एकूण पाच पाणीपाळ्या सोडण्यात आल्या. मात्र सद्दस्थितीत शेतीला चौथ्या आवर्तनाची गरज असल्याने व सध्या येलदरी धरणात ६२ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने पूर्णा प्रकल्पासाठी पाणीपाळी सोडण्याचे आदेश द्यावेत. अशी मागणी आ. बालाजी कल्याणकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेवून अखेर पूर्णा प्रकल्पासाठी उन्हाळी हंगामातील चौथ्या आवर्तनाची पाणीपाळी सोडली गेली असून त्याचे जलपूजन आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. डी. भालेराव, शाखा अभियंता पी. डी. मयड, डॉ. पोपळे, शिवसेना तालुकाप्रमुख जयवंत कदम, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष नारायण कदम, घनश्याम सुर्यवंशी, आनंदाराव सुर्यवंशी, गजानन सुर्यवंशी, दिपक सौदे, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष होळपाने यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

गरजूंना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

नांदेड : लॉकडाउन काळात गोरगरीब जनतेची उपासमार होऊ नये, गरिब कुटुंबांना मदत व्हावी या उद्देशाने भदंत पय्याबोधी थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ गरजू कुटुंबीयांना महा प्रजापती महिला मंडळ कैलासनगर यांच्या वतीने तांदूळ, दाळ, तेल पॉकेट इत्यादी जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 

यापूर्वी भदंत पय्याबोधी यांच्या माध्यमातून समाजातील उपासकांकडून गरजूंना ५० क्विंटल धान्य वाटप करण्यात आले होते. महिला मंडळाच्या वतीने रमा काशिदे, नंदा सोनकांबळे, संगिता भालेराव, मनिषा भालेराव, संध्या नरवाडे, वंदना राजभोज, ललिता कांबळे यांनी पुढाकार घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

ज्योती फाउंडेशनकडून धान्य वाटप

नांदेड : कोरोनासारख्या या महामारीत सर्वसामान्यांची उपासमार सुरू आहे. यामुळे त्यांना या संकटातून बाहेर पडण्यासाठी धीर मिळावा म्हणून लोहा येतील ज्योती फाउंडेशनने पुढाकार घेत जवळपास दिडशे झोपडपट्टीत राहणाऱ्या गरिबांना धान्य वाटप केले. यावेळी फाउंडेशनच्या संचालिका ज्योती सावळे आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकार विद्या आळणे यांची उपस्थिती होती. 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात मागील दोन महिण्यापासून लॉकडाउन सुरू आहे. येत्या दोन दिवसानंतर पुन्हा पाचवे लॉकडाउन लागण्याचे संकेत आहेत. या काळात सर्वसामान्य कामगारांच्या हातचे काम गेल्याने होते ते घरातील धान्य व सामान संपले. आता त्यांच्या खाण्याचे वांधे होत आहेत. त्यांच्याही पोटाला अन्न  मिळावे यासाठी ज्योती फाउंडेशनने पुढाकार घेत लोहा शहरातील काही झोपडपट्टीची पाहणी केली. गरजु व आवश्‍यक असलेल्या जवळपास दिडशे कामगारांना त्यांनी स्वखर्चातून धान्य वाटप केले. तांदूळ व दाळ तसेच आवश्‍यक सामानांची कीट त्यांना देण्यात आली. यावेळी संस्थेच्या श्‍वेता सावळे, विजय जोंधळे, लक्ष्मण कदम, अनिल डोईफळे यांची उपस्थिती होती. शासनाच्या लॉकडाउनच्या अटी शर्थीच्या अधीन राहून हे धान्य वाटप केल्याचे ज्योती सावळे यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT