nanded district concept of police friend network for finding criminals collapsed
nanded district concept of police friend network for finding criminals collapsed  sakal
नांदेड

नांदेड जिल्ह्यात पोलिस मित्र संकल्पना निघाली मोडीत

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात काही वर्षापूर्वी पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे जनतेशी थेट संबंध होते. तसेच खबऱ्यांचे नेटवर्कही तगडे होते. त्यामुळे कोणत्याही अनुचित प्रकाराची माहिती अगोदर पोलिसांना कळत होती. परंतु, गेल्या काही वर्षात पोलिसांचा जनतेशी असलेला संवाद हरवला आहे. पोलिस मित्रासारखी चांगली कल्पनाही मोडीत निघाली आहे. तसेच खबऱ्यांचे नेटवर्क कोलमडले असल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावत आहे.

जिल्ह्यात लक्ष्मीनारायण, फत्तेसिंह पाटील, रवींद्र सिंघल, शहाजी उमाप, मनोजकुमार शर्मा, लक्ष्मीकांत पाटील, चंद्रकिशोर मीणा अशा दमदार अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकुशलतेने कारकीर्द गाजविली होती. नांदेडकरांच्या नजरेत आजही ते पोलिस दलातील हिरो आहेत. त्यांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण ठेवण्यासह सामान्यांशी संवादाची नाळही जोडली होती. त्यामुळे कोणतीही घटना किंना अनुचित प्रकाराबाबत सर्वसामान्य नागरिक विश्वासाने त्यांच्याशी संपर्क साधत होते. विशेष म्हणजे हे अधिकारीही जनतेमध्ये मिसळून राहत होते.

विशेष म्हणजे ठाण्यातील पोलिस निरीक्षकही हजारोंच्या जमावाला एकटे सामोरे जात होते. कारण प्रत्येकाला ते नावानिशी ओळखत होते. त्यामुळे खाकीचा धाक होता. आदरही होता. परंतु, गेल्या काही वर्षात सर्व चित्र पालटले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ठाणेदारांनीही आपल्या भागातील लोकांशी संपर्क तोडला आहे. खबरेही पोलिसांपासून दुरावले आहेत. त्यामुळे गुन्ह्यांची मालिका सुरुच आहे. गुन्हेगारांच्या शोधासाठी पोलिसांना थेट जनतेशी नाळ जोडावी लागणार आहे. जेणेकरून कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

ठाण्यातील डीबी पथके निष्क्रिय

प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथके (डीबी) स्थापन करण्यात आलेली आहेत. परंतु, वजिराबादची एकमेव डिबी सोडलीतर कोणत्याही डिबी पथकाकडून विशेष अशी भरीव कामगिरी केल्याचे दिसून येत नाही. कोणत्याही मोठ्या घटनेची जबाबदारी त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेवरच येवून पडते. निष्क्रिय झालेली ही डिबी पथके नेमकी कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.

तुम्ही तुमच्या भागाचे रक्षक

तत्कालीन पोलिस अधीक्षक रविंद्र सिंघल, उपअधीक्षक मनोजकुमार शर्मा, चंद्रकांत पाटील यांनी प्रत्येक भागातील तरुणांची टीम गोळा केली होती. बंद, धार्मिक मिरवणुक, संवेदनशील विषय असतील त्यावेळी हे अधिकारी त्या भागातील तरुणांना एकत्र करून त्यांना पोलिस मित्र नावाचे टि-शर्ट द्यायचे. तसेच त्यांच्या भागाची सुरक्षा त्यांच्यावरच सोपवायचे. गरज पडल्यासच पोलिस तिथे हस्तक्षेप करत होते. त्यामुळे त्या भागातील गुन्हेगारी, अनुचित घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसत होता, अशी आठवण ज्येष्ठ नागरिक साहेबराव गोराडे पाटील यांनी सांगितली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT