Nanded kandhar Water scarcity sakal
नांदेड

नांदेड : आसान नगर परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष; नागरिकांत प्रचंड रोष

हुतात्मा स्मारकमधील जलकुंभ पाच ते सात वर्षांपासून शोभेची वस्तु

सकाळ वृत्तसेवा

कंधार : नवीन वस्त्यात पाणी पुरवठा करण्यासाठी कंधारमधील हुतात्मा स्मारकात दोन लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले खरे, पण हे जलकुंभ गेल्या पाच ते सात वर्षांपासून शोभेची वस्तु बनले आहे. यामुळे जलकुंभाचे उद्देश साध्य झाले नसल्याचे चित्र आहे. कंत्राटदारांकडून अद्याप हे जलकुंभ पालिकेला वर्ग केले गेले नसल्याची माहिती आहे. कंत्राटदार व पालिका प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाचा फटका मात्र आसान नगर परिसरातील नागरिकांना बसत असून येथील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

शहराला कायमस्वरूपी पाणी पुरवठा करण्यासाठी लिंबोटी धरणातून २५ ते ३० कोटींची पाणी पुरवठा योजना घेण्यात आली. अद्यापही ही योजना पूर्णपणे कार्यान्वित झाली नाही, हे विशेष होय. पाणी पुरवठा योजना करताना भीमगडावरील नवीन वस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी हुतात्मा स्मारकात दोन लाख लिटरचे जलकुंभ उभारण्यात आले. नवीन वस्त्यांचा विचार केला तर कमीतकमी पाच लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ आवश्यक होते, परंतु दोन लाख लिटरवरच बोळवण करण्यात आली. कमी क्षमतेचे का असे ना हे जलकुंभ सुरू करणे आवश्यक होते. परंतु गेल्या पाच-सात वर्षांपासून त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही.

मधल्या काळात आसान नगर मध्ये पाईप लाईन करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. जलकुंभ झाले, पाइपलाइन झाली, आता पाणी मिळणार असे तेथील नागरिकांना वाटत होते. परंतु पाइपलाइन करून अडीच-तीन वर्षे लोटूनही पाणी काही मिळाले नाही. लिंबोटी धरणातून करण्यात आलेल्या कायमस्वरूपी पाणी पुरवठा योजनेचे बिल रखडल्याने कंत्राटदाराने या योजनेला पूर्णपणे पालिकेकडे वर्ग केलेले नाही. त्यामुळे अद्यापही शहरात म्हणावा तसा पाणी पुरवठा होत नाही.

दोन दिवस आड पाणी सोडले जाते. याच योजनेत हुतात्मा स्मारकात जलकुंभ बांधण्यात आल्याने कंत्राटदार जलकुंभला पाण्याची पाइपलाइन जोडण्यासाठी चालढकल करीत असल्याची चर्चा आहे. बिल रखडण्यास काय कारण झाले, यात कंत्राटदाराची चूक आहे की पालिका प्रशासनाची हा संशोधनाचा विषय असून गेल्या आठ-दहा वर्षात झालेल्या नगरपालिकेतील गटबाजीचे राजकारण याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.

मतदानावर बहिष्कार

आसान नगर परिसरातील नागरिकांनी पाणी मिळावे म्हणून सर्वच पुढाऱ्यांकडे ग्राहणे मांडले. निवडणुकीच्या वेळी त्यांना आश्वासन मिळतात. पण त्याची पूर्तता होत नाही. यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली आहे. नळ जोडणीसाठी आता येथील नागरिक आक्रमक झाले असून पाण्यासाठी येणाऱ्या पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा विचार त्यांच्याकडून केला जात असल्याची चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAK vs UAE: what a throw! पाकिस्तानी खेळाडूने अम्पायरला चेंडू फेकून मारला, वसीम अक्रमने केलं कौतुक! सोशल मीडियावर ट्रोल

Kharadi Traffic : खराडी-हडपसर रस्त्यावर बेशिस्त पार्किंग, वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता; नागरिकांची कारवाईची मागणी

Handshake Controversy Timeline : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची टप्प्याटप्प्याने कशी नाचक्की होत गेली ते वाचा... Andy Pycroft प्रकरण त्यांच्यावरच कसं उलटलं?

Latest Maharashtra News Updates : आयएमएच्या राज्यस्तरीय बंदला कल्याणमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Family Travel Tips: फॅमिलीसोबत प्रवासात निघालात? डिहायड्रेशनपासून बचावासाठी ही फळं सोबत ठेवा!

SCROLL FOR NEXT