बेळगाव : वादळी पावसामुळे शहर आणि परिसरात पडलेली झाडे व फांद्या अनेक ठिकाणी अद्यापही पडून आहेत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन वन खात्याने झाडे व फांद्या हटविण्याचे काम हाती घेणे गरजेचे आहे. शहरात अनेक वर्षांपूर्वी लावलेली झाडे आहेत. मात्र अलीकडे ही झाडे धोकादायक बनू लागली असून शहरात रस्ते, ड्रेनेज वाहिनी व इतर कामांसाठी जेसीबी लावून खोदाई केली जाते. त्यावेळी झाडांची मुळे कमकुवत बनत आहेत. त्यामुळे शहरात झाडे पडण्याचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढल्याचे मत शहरवासीयांमधून व्यक्त होत आहे. पंधरा दिवसात शहरात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या पडल्या. त्यामुळे अनेक नागरिकांच्या वाहनांचे नुकसान होण्यासह एका व्यक्तीला जीव गमवावा लागला आहे.
झाडे व फांद्या पडल्यामुळे मंगळवारी एका दिवसात ५० हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे. नागरिक मोठ्या कष्टाने दुचाकी खरेदी करीत असतात. वादळी वाऱ्यामुळे झाडे पडल्यानंतर नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. झाड किंवा फांदी पडल्याची माहिती दिल्यानंतर देखील वनखात्याकडून वेळेत दखल घेतली जात नाही.
ज्या ठिकाणी धोकादायक झाडे आहेत. त्या ठिकाणी पाहणी करून ती झाडे हटविणे गरजेचे आहे. वन खात्याने लक्ष द्यावे.
- विजय मोरे, माजी महापौर
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.