Chakkajam-Agitation
Chakkajam-Agitation 
पश्चिम महाराष्ट्र

डिझेल विक्री घटली निम्म्याने

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - ऑल मोटर्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी चक्काजाम आंदोलनाचा परिणाम आज शहरातील बाजारपेठांवर लक्षणीय प्रमाणात दिसत होता. वाहतूक बंद असल्याने धान्य, कांदा-बटाटा यांची आवक प्रचंड घटली. पुढील दोन दिवसांनी कांदा-बटाट्याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यातील सुमारे दहा हजार ट्रक बंद असल्याने डिझेलच्या मागणीत ५० टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपचालकांचा तोटा झाला आहे. 

पेट्रोल-डिझेल दरवाढ रद्द करावी, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी ऑल मोटर्स ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने देशव्यापी चक्का जाम आंदोलन पुकारले आहे. चार दिवसांपासून जिल्ह्यातील सुमारे १० हजार ट्रक थांबून आहेत. राज्यातही या बंदला ट्रकचालक, मालकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने पर जिल्ह्यातून येणारी वाहतूक बंद आहे. आज मार्केट यार्डमध्ये कांदा आणि बटाट्याची आवक घटली, मात्र वाहतूक बंद असल्याने बटाट्यांचे ट्रक आले नाहीत.

सध्या शहरातील बाजार पेठांत असणारा कांदा पुढील दोन दिवसांत संपेल व आवक घटल्याने कांदे, बटाट्यांचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. चक्का जाममुळे धान्याची आवकही घटली आहे. आज धान्याचा एकही ट्रक मार्केट यार्डात आला नाही. सफरचंदाची आवकही घटली असून, तीन दिवसांत सफरचंदाची वाहतूकही बंद आहे. ट्रक बंद असल्यामुळे डिझेलची मागणी घटली आहे. महामार्गांवरील पेट्रोल पंपांवर ट्रक थांबून आहेत.

कोकणात जाणारा माल गोदामातच
नदीच्या पुरामुळे कोकणात जाणारे काही मार्ग बंद होते. त्यामुळे धान्य, जीवनावश्‍याक वस्तूंची वाहतूक बंद होती. त्यानंतर लगेचच वाहतूकदारांचा संप सुरू झाल्याने कोकणात होणारी माल वाहतूक ठप्प आहे. सर्व माल गोदामातच पडला आहे.

रोजची मालवाहतूक
वस्तू              आवक (पूर्वी)    आवक (आज)

कांदा, बटाटा      ५० ट्रक            १० ट्रक
धान्य                १५ ट्रक             ० ट्रक 

ट्रक बंद असल्याने डिझेलची मागणी ४० ते ५० टक्‍क्‍यांनी घटली आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर पेट्रोलपंपचालकांना आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जर माल वाहतूकदारांनी पेट्रोल व डिझेलची वाहतूकही थांबवली तर नागरिकांनाही पेट्रोल-डिझेलसाठी रांगा लावाव्या लागतील. 
- अमोल कोरगावकर, पेट्रोलपंप मालक.

वाहतूकदारांच्या संपामुळे कांदा, बटाटा, धान्य यांची आवक घटली आहे. शेतीमाल नाशवंत असल्याने वाहतूकदारांनी याची वाहतूक सुरू ठेवावी. अन्यथा शेतकऱ्यांचे नुकसान होईल. 
- मोहन सालपे, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT