पश्चिम महाराष्ट्र

इज्तेमामध्ये नऊ सामूहिक विवाह संपन्न

सुनील गर्जे

नेवासे : येथे तब्लीकी जमाततर्फे आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमामध्ये शेवटच्या दिवशी शनिवारी (ता. 3) रात्री झालेल्या विश्वशांती दुवा कार्येक्रमात जिल्हाभरातून सुमारे दीडलाख भाविक सहभागी  झाले होते. इज्तेमामध्ये राज्यातील धर्मगुरूंच्या उपस्थितीत नऊ सामुदायिक विवाह पार पडले. गेल्या दोन दिवसात स्वयंसेवकांसह उपस्थित भाविकांनी धार्मिक कार्येक्रमांबरोबरच समाजसेवेचाही आनंद घेतला. मुख्य दुवाच्या कार्यक्रमानंतर इज्तेमाची सांगता झाली. दोन दिवसात सुमारे सव्वाकोटी रुपयांची उलाढाल झाली.

नेवासे फाटा रस्त्याच्या मध्यावर असलेल्या काझी नगरच्या चारशे एकर मैदानावरील इज्तेमाला उपस्थित भाविकांना तब्लिक जमात राज्याचे प्रमुख हफिज मंजूर, नांदेडचे मौलाना साद अब्दुल, मुबंईचे मौलाना शोएब, मालेगावचे हजी लायिक मौलाना, तब्लिक जमातीचे नगर जिल्हा प्रमुख अब्दुल सलाम अमीर यांनी मानवता हाच धर्म असून सर्वांनी भेदभाव विसरावे. जातीभेद न ठेवता सत्याच्या मार्गाने चालावे, कोणालाही दुखवू नये, शेजारधर्म पाळावा, शर्माच्या नीतीवर चालत न्याय करावा, भांडण तंटे यात कोणालाही समाधान नाही, आई-वडिलांची सेवा व त्यांचे हक्क यावर प्रवचन झाले.

शनिवारी शेवटच्या दिवशी विशेषत: दुवामध्ये सामील होण्यासाठी जिल्ह्यातून सकाळपासूनच भाविक इज्तेमा ठिकाणी येत होते. रात्री नऊ वाजता याठिकाणी सुमाडे दिडलाख भाविकांनी दुवा करयेकरमात उपस्थिती लावली. दरम्यान इज्तेमा स्थळी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष पांडुरंग अभंग, आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विठ्ठल लंघे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष संजय सुखधान, युवानेते रावसाहेब कांगुणे, जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, मुकिंदापूरचे सरपंच सतीश निपुंगे यांनी भेट दिली.

विश्वशांतीसाठी झाली दुवा

इजतेमा महत्वाचे मानल्या जाणार्‍या सामूहिक दुवा कार्येक्रमात देशासह विश्वात शांती नांदो देशामध्ये जातीय सलोखा राहो, माणुसकी धर्म सर्वांनी पाळावा, एकमेकांच्या सुखदुःखामध्ये धावून जावे, मानवजातीच्या कल्याणासाठी व सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी सामुहिक दुवा रात्री 9 वाजून 10 मिनिटाला हफिज मंजूर यांनी केली.

हा आदर्श घेण्यासारखा : प्रशांत गडाख 

"धार्मिक कार्येक्रमाने समाजा-समाजात एकोपा, बंधुत्व व सहकार्‍याची भावना निर्माण होते. येथील शिस्त, ठेवण्यात आलेली स्वच्छता व स्वंयसेवक, आयोजकांनी जिल्ह्यातून येणार्‍या भाविकांचे आदरतीथ्याने स्वागत करून तालुक्याची परंपरा कायम ठेवली. इजतेमा समाजाला आदर्श घालून देणारा असल्याची अशी प्रतिक्रिया यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी यावेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौची सामन्यावर पकड, स्टॉयनिस अन् दीपक हुड्डा लढवला किल्ला

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT