नेवासे : "साडेतीनशे प्रकरणे नेवासे तहसीलमध्ये पडून आहेत. पालकमंत्री शेत पाणंद रस्ते योजना ही महत्वाची योजना असून रस्ताच्या प्रश्नांवरून होणारे वाद, हेवेदावे टाळण्यासाठी रस्त्यांची प्रश्ने मार्गी लावण्यासाठी ही योजना महत्वाची आहे. प्रलंबित प्रकरणे समन्वयाने निकाली काढा व नकाशाच्या आधारे रस्त्यातील वाद दूर करा असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले.
शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणमधून पालकमंत्री शेत/पाणंद रस्त्याच्या योजनेचा शुभारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते मंगळवार (ता. २) रोजी श्रीक्षेत्र देवगड (ता. नेवासे) येथे करण्यात आला. त्याप्रसंगी आमदार मुरकुटे बोलत होते. यावेळी तहसीलदार सुधीर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, श्रीराम महाराज पेहरे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भदगले, शिवसेनेचे तालुका प्रमुख बाळासाहेब पवार, दत्तात्रय काळे, अजित मुरकुटे, गटविकास अधिकारी अनंत परदेशी, नायब तहसिलदार नारायण कोरडे, सरपंच ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर काकासाहेब शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुनील नरसाळे, पंचायत समितीचे उपअभियंता गजानन देशमुख, नगरसेवक सुनील वाघ, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कोलते, होमगार्ड तालुका समादेशक बाळासाहेब देवखिळे, सरपंच दादासाहेब कोकणे, गजानन देशमुख उपस्थित होते.
गुरुवर्य भास्करगिरी महाराज म्हणाले, "मतभेद बाजूला ठेऊन सर्वांच्या हितासाठी असलेले शेत पाणंद रस्ते खुले करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. समाजहित पहाणे हे सरकारचे काम आहे. सरकारचा हा उपक्रम कौतुकास्पद असून राजकारणातून समाजकार्य करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. शेत व पाणंद रस्ते खुले करण्याचा सरकारचा हा उपक्रम कौतुकास्पद असून राजकारणातून समाजकार्य करण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे, मतभेद व जिरवाजिरवी बाजूला ठेऊन सर्वांच्या फायद्यासाठी असलेले हे रस्ते मोकळे होण्यासाठी प्रयत्न करा, गावातील एकोपा टिकवून सुख कायमस्वरूपी गावागावात नांदण्यासाठी प्रयत्न करा, सुदोपसुंदी टाळा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय काळे,पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे यांची भाषणे झाली.
प्रास्ताविक करताना तहसीलदार सुधीर पाटील म्हणाले, "तालुक्यातील सुमारे एक हजार ३५० रस्ते लोकसहभाग व श्रमदानातून शेत व पाणंद रस्ते खुले करण्यासाठी आहेत. यावेळी सरपंच अजय साबळे, भीमाशंकर वरखडे, आण्णा दिघे, सुनील वाघ, शिवाजी कोलते, बाळासाहेब देवखिळे, भीमाशंकर वरखडे, तलाठी आण्णा दिघे, सोपान गायकवाड, ग्रामसेवक संतोष साबळे उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर आप्पासाहेब वरखडे यांनी आभार मानले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.