सोलापूर : कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केलेल्या राज्यातील 78 लाख 38 हजार 658 शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत फक्त 37 लाख 39 हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला आहे. कर्जमाफीला 28 जून रोजी वर्ष पूर्ण होत असूनही आणखी सुमारे 41 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेतच आहेत.
दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून कर्जमाफी दिली. परंतु, नेमक्या थकबाकीदार व कर्जदार शेतकऱ्यांचा शोध घेण्याकरिता त्यांच्या माहितीचे गावोगावी चावडी वाचन करण्यात आले. त्यानंतर तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय समित्यांच्या माध्यमातून लेखापरीक्षकांमार्फत पडताळणी झाली. बॅंकांकडून वेळोवेळी माहितीही घेतली. तरीही बहुतांशी शेतकऱ्यांना आपण कर्जमाफीसाठी पात्र आहोत की नाहीत याचा थांगपत्ता लागलेला नाही. आतापर्यंत यादीत नाव न आलेल्या शेतकऱ्यांना आता बॅंकांकडून कर्ज भरण्याकरिता तगादा लावला जात आहे. तसेच नव्याने कर्ज घेण्यासाठी अडचणी येत आहेत.
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची सुमारे एक हजार 400 लेखापरीक्षकांमार्फत फेरपडताळणी होणार आहे. तसेच लाभ न मिळालेल्या यलो लिस्टमधील शेतकऱ्यांची सध्या पडताळणी सुरू असून त्यांना लवकरच लाभ मिळेल, असे सहकार विभागाचे मुख्य सचिव एस. एस. संधू यांनी यापूर्वीच सांगितले आहे.
आकडे बोलतात...
राज्यातील एकूण शेतकरी
1,36,00000
कर्जमाफीसाठी पात्र शेतकरी
89,00,000
कर्जमाफीसाठी तरतूद
34,022 कोटी
ऑनलाइन अर्जदार
77,05,980
मुदतवाढीतील अर्जदार
1,32,678
बॅंकांना पाठविलेली यादी
46,50,000 शेतकरी
रक्कम मिळालेले
37,39,000 शेतकरी
अदा केलेली रक्कम
14,950 कोटी
शिल्लक शेतकरी
40,99,658
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.