Girish-Mahajan
Girish-Mahajan 
पश्चिम महाराष्ट्र

पंचनामे युद्धपातळीवर - गिरीश महाजन

सकाळ वृत्तसेवा

सांगली - महापालिकेसह पाणी, वीजपुरवठा, स्वच्छता, पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सरकारने जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानाचे उद्या (ता. १३) पासून वाटप सुरू होईल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी बोलताना दिली.

सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील महापूर स्थिती उद्‌भवल्यानंतर महाजन गेले पाच दिवस सांगलीत ठाण मांडून बसले आहेत. जिल्ह्यातील पूरस्थितीबाबतचा आढावा घेताना ते म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील पूरस्थितीत सुधारणा होत आहे. कृष्णा नदीपात्रात पाणी जाण्यासाठी दोन दिवस लागतील. पूरस्थितीत महापालिका आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीकडून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. 

शेती आणि घरांचे पंचनामे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातून तलाठी, ग्रामसेवकांची फौज कामाला लावली आहे. विद्युत पुरवठा तातडीने पूर्ण करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. मिरज शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, तर सांगलीचा पाणीपुरवठा बुधवारी सुरळीत होईल.

जिल्ह्यातील १२२ पाणी योजनांच्या पुरवठ्यासाठी रोहित्रांसह अन्य पुरवठा सुरू आहे. सरकारच्या मदत निधीचे उद्यापासून वाटप सुरू होईल. पूरग्रस्तांना मोफत १० किलो गहू व १० किलो तांदळाचे वाटप सुरू करीत आहोत.’’

ते म्हणाले, ‘‘संपूर्ण राज्यातील पूर पट्ट्याबाबत सरकारवर निर्णय घ्यावयाची वेळ आली आहे. त्यांना पूर पट्ट्यातून बाहेर काढून त्यांच्यासाठी नव्याने जागा संपादित करावी लागेल आणि नवीन ठिकाणी वसाहती वसवाव्या लागतील. 

संपूर्ण राज्याचा हा विषय आहे. प्रत्येक वर्षी सुरक्षा, मदतीचा विचार करता आता पूर पट्ट्यातील लोकांना सक्तीने बाहेर घालवायची वेळ आली आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : पुणे-मुंबई हायवेवर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने

SCROLL FOR NEXT