पश्चिम महाराष्ट्र

कळवीकट्टेतील हिंदूंचे ‘पीरदेव’ मंदिर

अजित माद्याळे

गडहिंग्लज - कळवीकट्टे (ता. गडहिंग्लज) या गावात एकही मुस्लिम नाही. तरीही गावचे ग्रामदैवत ‘पीर’ आहे. पिराच्या ठिकाणाला येथे ‘पिराचं देऊळ’ म्हणतात. मोहरम हा एकच मोठा उत्सव येथे होतो. ग्रामस्थ जातीच्या भिंती ओलांडून ‘पीर’च आपला देव मानतात. हिंदूंच्या या पीरदेव मंदिराच्या माध्यमातून एकतेचा संदेश दोनशे वर्षे अखंड दिला जात आहे.
मोहरम आला की येथील ग्रामस्थ घरांची स्वच्छता करतात. याबाबत प्रकाश देसाई म्हणाले,‘‘ मोहरम हाच आमचा मोठा सण, त्यासाठी सर्व तयारी.’’

गावातील ज्येष्ठ नागरिक शिवाजी भोगूलकर या परंपरेविषयी म्हणाले, ‘‘माझा जन्म १९३७ चा. मला कळायला लागल्यापासून गाव मोहरम साजरा करत असल्याचे पाहत आलो आहे. अगदी अठराव्या शतकापासून तो सुरू आहे, असे आमच्यातील जुने-जाणते सांगतात. पीर हे गावचे ग्रामदैवत आहे. त्यावर लोकांची श्रद्धा आहे. पिराची पूजा करण्यासाठी गावात मुस्लिम बांधव नसल्याने जवळच्या तेरणीहून (ता. गडहिंग्लज) पुजारी येतात. रोज पिराची पूजा होते. हिंदूंच्या मंदिरांची जशी यात्रा होते, तसाच मोठा उत्सव मोहरमला भरतो. मोहरमच्या आधीपासूनच माहेरवाशिणींचा गावात राबता सुरू होतो. मोहरममध्ये पाटील गल्ली, रयत गल्ली व नाईक गल्लीसह इतर गल्ल्यांमध्ये गोफचा (दोरी) खेळ होतो. ‘करबल’मध्ये (रिवायतची गाणी) हिंदी, कन्नड, मराठीच्या आगळ्या-वेगळ्या गाण्यांद्वारे सवाल-जबाब रंगतो.’’ 

गावात एकही मुस्लिम बांधव नसतानाही साजरा होणारा मोहरम हे गावचे वैभव आहे. गावात वर्षाला एकमेव हाच सण मोठा असतो. हिंदू मंदिराच्या यात्रेत जसा उत्साह असतो, तसेच वातावरण मोहरममध्ये असते.
- शिवाजी भोगूलकर,
कळवीकट्टे

एक रुपयाही लोकवर्गणी नाही

मोहरमसाठी गावातून एक रुपयाचीही वर्गणी गोळा केली जात नाही. दहापैकी तीन दिवस मुख्य सोहळा असतो. शाकाहारी व मांसाहारी जेवणाचा बेत असतो. घरटी १० ते ४० हजारापर्यंत खर्च येतो. दरवर्षी भाविक ताबूत बांधकामाचा नवस बोलतात. ग्रामपंचायतींमध्ये प्रतीक्षा यादी आहे. यादीनुसार ज्याचा नंबर येईल, त्यानेच ताबूत बांधकामासह पीर मंदिर रंगरंगोटी, पुजाऱ्यांच्या दहा दिवसांच्या भोजन खर्चाची जबाबदारी उचलायची. यंदा बोललेले नवस फेडण्यासाठी एकेकांना पाच, दहा, पंधरा वर्षे प्रतीक्षा करावी लागते.

हिंदू लोक बनतात मूक फकीर
तेरणी येथील अब्दुलकादर हुसेन जमादार हे मुख्य पुजारी आहेत. ३५ वर्षांपासून ते हे काम करतात. गावातील पाटील, मोहिते, पोवार, चौगुले, कुलकर्णी, देसाई, सुतार हे हक्कदार असून ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी मोहरमसाठी पुढाकार घेतात. पंजे स्थापनानंतर गावात कोणीही कसलेही काम करत नाहीत. मोहरममध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम बांधवांत मूक फकीर होण्याची पद्धत आहे, तशीच परंपरा गावातील हिंदू लोकांनीही 
कायम ठेवली आहे. दरवर्षी शंभराहून अधिक लोक मूक फकीर होतात. तीन दिवस ते मौनव्रत धारण करतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT