पश्चिम महाराष्ट्र

सरकार, केंद्र बंद आहे; सांगा ना, तूर ठेवू कुठे?

सकाळवृत्तसेवा

जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडे २००० क्विंटल शिल्लक

सांगली - हमीभावात तूर विकण्यासाठी जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र शासनाने खरेदी केंद्रच बंद केले आहे. तूर विकायची कुठे, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जत तालुक्‍यासह आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्‍यांत २,१०० क्विंटलहून अधिक तूर शिल्लक आहे, असा अंदाज आहे. खरेदी केंद्र बंद असल्याने व तूर ठेवण्यासाठी गोदामच नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तरी तूर घरीच ठेवणे पसंत केले आहे.

जत तालुक्‍यात ६५०० हेक्‍टरवर तुरीचा पेरा झाला होता. जत तालुक्‍यात शेतमाल ठेवण्यासाठी ना शासकीय गोदाम आहे, ना बाजार समितीचे. ‘तूर कुठे ठेवायची’, असा सवाल शेतकरी करत आहेत. 

सांगलीतील वेअर हाऊसमधील नाफेडचे तूर खरेदी केंद्र बंद आहे. जत तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी या केंद्रावर तूर विक्रीसाठी आणण्याकडे पाठ फिरवली. त्याचे कारण म्हणजे जत-सांगली हे अंतर १०५ किलोमीटर आहे. तुरीची ने-आण करणे परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरातच तुरीचा साठा केला आहे. तूर घरात ठेवल्याने भुरीचा प्रादुर्भाव होऊन नुकसान होण्याचा धोका आहे. जतमधील शेतकऱ्यांच्या शिल्लक तुरीला हमीभाव ५०५० रुपये देऊन खरेदी करावी, अशी मागणी उत्पादक शेतकरी करीत आहेत.

बारदान नाही म्हणून तूर विकली नाही. आता तूर विक्रीची मुदत संपली आहे. २० क्विंटल तूर घरातच ठेवली. कमी दरात विकावी लागते. जनावरांना खाद्य म्हणून घालणार आहे.
- कामान्ना पाटील, शेतकरी, संख (जि. सांगली)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT