Crop damaged in stormy rains in Kolhapur
Crop damaged in stormy rains in Kolhapur 
पश्चिम महाराष्ट्र

पुरात वाचलेल्या कोल्हापुरातील पिकांना परतीच्या पावसाचा दणका 

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर -  जिल्ह्यात दररोज होणाऱ्या मुसळधार आणि ढगफुटीसारख्या पावसाने पिकांची दाणादाण उडाली आहे. सोयाबीन, भुईमूग, नाचणी पिकांनी माना चिखलात टाकल्याने नुकसान झाले आहे. कापणीस आलेल्या भातांच्या लोंब्या चिखलात गेल्याने त्याचा मोठा फटका भात उत्पादकांना बसला आहे. दरम्यान बुधवार (ता. 23) पासून नुकसानग्रस्त पिकांची कृषी विभागातर्फे पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

भात, सोयाबीन व नाचणी कापणी आणि छाटणीवेळीचे ढगफुटीसारखा परतीचा पाऊस होत असल्याने पिकांचा चिखल झाला आहे. अजूनही पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याने उरलीसुरली पिकेही मातीमोल होण्याच्या मार्गावर आहेत. 
परतीच्या पावसामुळे राधानगरी, करवीर, आजरा, कागल, हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यांत सर्वाधिक नुकसान झाले आहे. गेल्यावर्षी याच दिवसांत पन्नास टक्के भात, भुईमूग, सोयाबीन पिकांची कापणी व छाटणी पूर्ण झाली होती. थंडीमुळे गारठून गेलेल्या उसात गोडवा तयार होत होता. आता मात्र थंडीऐवजी पावसामुळे गारठलेल्या उसाचा गोडवा कमी होणार असल्याचे चित्र आहे. 

भात व सोयाबीन पीक काढून मका, गहू किंवा इतर पिकांच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असते. आता मात्र शेतातील नुकसान झालेली पिके आहे त्या परिस्थितीत बाहेर काढण्याचे काम सुरू करावे लागत आहे. दुपारपर्यंत संततधार पडणारा पाऊस दुपारनंतर अतिवृष्टी किंवा ढगफुटीसारखा पाउस होतो. ऑक्‍टोबर किंवा दसऱ्यानंतर गुऱ्हाळांच्या कामाला वेग आलेला असतो. पूर आणि अतिवृष्टीमुळे नूकसान झालेली गुऱ्हाळे सावरण्यासाठी किंवा त्याची डागडुजी करण्यासाठी गुऱ्हाळ चालक आणि मालकांना कसरत करावी लागत आहे. 

गुऱ्हाळघरांनाही दणका 
रोज होत असलेल्या अतिवृष्टीमुळे गुऱ्हाळघराच्या डागडुजीची कामेही खोळंबली आहेत. साखर कारखाने सुरू होण्याआधी गुऱ्हाळघरे किंवा गूळ निर्मितीला सुरवात होते. पाऊस जरी उघडला; तरीही अजून आठवडाभर उसाची तोडणी करता येणार नाही. अतिवृष्टी होत राहिली तर गाळप हंगामावरही याचा परिणाम होणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत केलेल्या आडसाली ऊसलागणीलाही जादा पावसाचा फटका बसत आहे. 

नोव्हेंबरपासून गुऱ्हाळ हंगाम सुरू होईल, अशी अपेक्षा आहे; मात्र ऑक्‍टोबर संपत आला, तरीही पावसाळाच सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. सध्या उसाचे नुकसान झालेच आहे. याशिवात भात, भुईमूग, सोयाबीन, नाचणीचेही नुकसान झाले आहे. 
- विलास तोडकर,
शेतकरी. 

जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक कामात होते. बुधवार (ता. 23) पासून परतीच्या पावसामुळे किती नुकसान झाले आहे याची पाहणी केली जाईल. 
- ज्ञानेश्‍वर वाकुरे,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...पुण्यात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

मतदान करण्यासाठी गेलेला मतदार जाग्यावरच कोसळला, अन्... महाड तालुक्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT