पश्चिम महाराष्ट्र

खेळाडूंना बक्षीस देण्यात महाराष्ट्राचा हात आखडताच

संदीप खांडेकर

महाराष्ट्र व हरियानातील खेळाडूंना सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रोख रकमेत तफावत आहे. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडूला राज्य सरकार एक कोटी रुपये देते, तर हरियानाचे सरकार सहा कोटी देते. शिवाय, सहभागासाठी १५ लाखांची पुंजी देते. या दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसाच्या रकमेच्या तुलनात्मक नजर टाकली, तर महाराष्ट्रातील खेळाडू नक्की कोठे कमी पडतात, अशी विचारणा क्रीडा क्षेत्रातून होणे साहजिक आहे. क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा दबदबा म्हणायचा आणि खेळाडूंना रक्कम तोकडी द्यायची, यावर टीकेचा सूर आहे. 

हरियाना सरकार ३८ प्रकारच्या स्पर्धांना शिष्यवृत्ती देऊन खेळाडूंना प्रोत्साहन देते. महाराष्ट्रात आठ प्रकारच्या स्पर्धांसाठी खेळाडूंना बक्षीस देते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह क्रीडा मार्गदर्शकांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन दोन्ही राज्ये खेळाच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसते. मात्र, दोन्ही राज्यांतील खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या रकमेत तफावत आढळते, अशी तक्रार क्रीडा तज्ज्ञांकडून व्यक्त होते.

राज्यातील आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व त्यांच्या क्रीडा मार्गदर्शकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्याची योजना महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणात अंतर्भूत आहे. उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना शासनातर्फे यापूर्वी वेळोवेळी रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. त्याच धर्तीवर भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूंना रोख पारितोषिक देण्याची योजना शासनाच्या विचाराधीन होती. त्यासाठी सुवर्ण, रौप्य व कास्यपदक 
प्राप्त खेळाडूंसाठी ठराविक रक्कम निश्‍चित केली आहे. 

ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या खेळाडूस महाराष्ट्र शासन एक कोटी, रौप्य पदकास ७५ लाख व कास्यपदकास ५० लाख रुपये देते. मार्गदर्शकासाठी अनुक्रमे २५ लाख, १८ लाख ७५ हजार व १२ लाख ५० हजार रक्कम देते. विशेष म्हणजे महाराष्ट्र शासन शालेय राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदकासाठी ११ हजार २५०, रौप्यपदकासाठी ८ हजार ९५०, तर कास्यपदकासाठी ६ हजार ७५० रुपये शिष्यवृत्ती देते. सहभागासाठी ही रक्कम ३ हजार ७५० रुपये आहे. हरियाना सरकारकडून देण्यात येणारी शिष्यवृत्ती पाचपट आहे. 

सुवर्णपदकासाठी ५० हजार, रौप्य ३० हजार, तर कास्यपदकासाठी २० हजार रुपये दिले जातात. त्याचबरोबर हरियाना सरकार ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी सुवर्णसाठी ५० हजार, रौप्य ३० हजार, तर कास्यसाठी २० हजार देते. हरियाना सरकारतर्फे खेलो इंडियात विजेत्या खेळाडूंसाठी याच पद्धतीने रक्कम दिली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT