पश्चिम महाराष्ट्र

दिल्लीश्वरांना खूश करण्यासाठी फडणवीस बेळगावात; जयंत पाटलांची टीका

मिलिंद देसाई

बेळगाव : मराठी भाषिकांच्या बाजूने देवेंद्र फडणवीस नाहीत हे त्यांनी दाखवून दिले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला विरोध करणे त्यांनी टाळयला पाहिजे होते. मात्र दिल्लीतील लोकांना खुश करण्यासाठी फडणवीस नेहमीच विरोधी भूमिका घेत असतात अशी टीका महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. बेळगावला हॉटेल मेरीयट येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, प्रकाश मरगाळे उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी बेळगावला येऊन समितीच्या विरोधात प्रचार सभा घेतली होती. या सभेचा पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, दिल्ली येथील हाय कमांडच्या सांगण्यावरून ते प्रचाराला आले, मात्र त्यांनी प्रचार सभा घेऊन मराठी भाषिकांच्या भावनांना छेद देण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रश्न असो किंवा इतर समस्यांबाबत ते केंद्राबरोबर भांडण्यासाठी कधीच एकत्र येत नाहीत. सत्तेत असतानाही फडणवीस सरकारने सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न किंवा समितीच्या मागण्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले, त्यामुळे येथील लोकांना भाजपबाबत वेगळा अनुभव आहे

सीमाप्रश्न सुटावा यासाठी शरद पवार, छगन भुजबळ आदींनी येथे येऊन अनेकदा आंदोलने केली आहेत. तसेच राष्ट्रवादी, शिवसेना यांनी नेहमीच येथील मराठी भाषिकांच्या बाजूने भूमिका घेतली आहे. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्यामुळे समितीच्या जुन्या नेत्यांसह युवा वर्गाचा मिलाफ झाला आहे. समितीचे उमेदवार चांगल्या संख्येने विधान सभेत निवडून जात होते. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आलेत ही चांगली गोष्ट आहे.

फडणवीस यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला संजय राऊत योग्य ते उत्तर देतील. सर्वोच्च न्यायालयात दाव्याला वेग यावा यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील आहे. तसेच वकील मंडळी पूर्ण तयारीशी न्यायालयात बाजू मांडण्यासाठी तयार आहेत. मात्र तारीख लांबणीवर पडत आहे, त्यामुळे दाव्याला विलंब होत आहे. मात्र याबाबत सरकार आपल्या पध्दतीने काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्याबाबतही विचार केला जाईल..

कोल्हापूर, सांगली आदी भागातील आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यासह आम्ही सातत्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांच्या संपर्कात असतो. तरीही महाराष्ट्र सरकारचे संपर्क कार्यालय बेळगाव पाहिजे अशी मागणी पुढे येत असेल तर त्याबाबत विचार केला जाईल अशी माहितीही मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT