river krishna
river krishna  
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाडला कृष्णा-कोयनेच्या पाण्याची चवच बदलली

हेमंत पवार

कऱहाड - संथ वाहते कृष्णामाई हे वाक्य आता कागदावरच राहिले आहे. टेंभु योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडवण्यात आल्यामुळे पाण्याचे वाहणे थांबले आहे. तीच स्थितील कृष्णा नदीला लागुन असलेल्या बारमाही वाहणाऱ्या कोयना नदीचीही झाली आहे. परिणामी पाणी अनेक दिवस साचुन त्याला दुर्गंधी येवु लागली आहे. पिण्यासाठी येणाऱ्या पाण्याचीही दोन दिवसापासुन चव बदलली आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्यास धोका निर्माण भिती वाटत आहे. 

दुष्काळी कडेगाव, आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी मिळावे या हेतुने सरकारने कऱ्हाडजवळुन वाहणाऱ्या कृष्णा नदीचे पाणी टेंभु गावच्या पात्रामध्ये अडवण्यात आले आहे. तेथुन पाणी उचलण्यसाठी पाण्याची आवश्यक पातळी ठेवावी लागते. ती ठेवण्यासाठी नदीचे वाहते पाणी अडवण्यात येते. अनेक दिवस पाणी अडवण्यात येत असल्याने कृष्णा-कोयना नद्यांच्या पाण्याचे वाहने थांबले जाते. परिणामी पाण्यामध्ये जलचर वाढुन शेवाळ्याची मोठ्या प्रमामात वाढ होत आहे. त्यामुळे पाण्याला दुर्गंधी येवुन ते वापरास अयोग्य होत आहे. त्याचबरोबर नदीच्या पाण्यात अनेक गावचे सांडपाणी मिसळते. त्यामुळे पाणी प्रदुषीत होण्यामध्ये वाढच होत आहे. पालिकेकडुन नदीचेच पाणी शुध्दीकरण करुन पिण्यास दिले जाते. मात्र गेल्या दोन दिवसापासुन त्याही पाण्याची चव बदलली आहे. शेवाळासारखा वास पाण्याला येवु लागला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टेंभु प्रशासन आणि पालिकेने याची दक्षता घेवुन योग्य त्या उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांतुन होत आहे. 

कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर दररोज शकडो आबालवृध्द पोहण्यासाठी येतात. मात्र टेंभु योजनेसाठी पाणी अडवल्याने पोहणाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. पाण्याला दुर्गंधी येवु लागल्याने त्यांना त्यामध्येच आंघोळ करावी लागत आहे. त्याचबरोबर पाण्याची पातळी वाढल्याने पोहणाऱ्यांना पाण्याचा अंदाज येत नसल्यानेही एखादा जीवानीशी जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Karisma Kapoor : "करिश्माने माझा जीव वाचवला"; अभिनेता हरीशने सांगितली 'त्या' अपघाताची आठवण

Latest Marathi News Live Update: राज्य सहकारी बँकेकडून विठ्ठल कारखान्याचा साखर साठा ताब्यात घेण्याची नोटीस प्रसिद्ध

उन्हाळ्यात रसाळ फळ खाल्ल्यानंतर किती वेळानंतर पाणी प्यावे? वाचा एका क्लिकवर

DRDO Missile Test : समुद्राच्या सुरक्षेत भारताचं मोठं पाऊल; स्वदेशी पाणबुडी विरोधी मिसाईलची चाचणी यशस्वी! पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT