पश्चिम महाराष्ट्र

शेतीमाल खासगी कंपन्यांनी खरेदी करण्यासाठी प्रयत्न - पालकमंत्री

सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी संकटात जातो. त्याला जास्तीत जास्त दर मिळवून देण्यासाठी खासगी कंपन्यांनी शेतीमाल खरेदी करावा, याबाबत शासन विचार करीत आहे. यातून स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल, हा या मागचा उद्देश असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

कणेरी येथे एका कार्यक्रमावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अनेकदा चांगले उत्पादन निघूनही त्याची विक्री कमी भावाने होत असल्याने शेतकरी अडचणी जातो. हे टाळण्यासाठी सरकार काही कंपन्यांशी संपर्क साधून संबंधित शेतमाल हमीभावाने घेण्याबाबत प्रयत्न करणार आहे. या कंपन्या जादा दराने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केल्यास इतर व्यापाऱ्यांनाही हमीभावाने तो खरेदी करावा लागेल. 

दीड रात्रीत घडामोडी होऊ शकतात
माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. याबाबत बोलताना श्री. पाटील यांनी ही बाब फारशी गांभीर्याने घेतलेली नाही. निवडणुकीला अद्याप दीड वर्षाचा कालावधी आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. याबाबतच्या घडामोडी दीड रात्रीतही होवू शकतात, असे ते म्‍हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT