कोल्हापूर - सलग सुट्यांमुळे गेली चार दिवस भवानी मंडप येथे पर्यटकांची गर्दी होते आहे.
कोल्हापूर - सलग सुट्यांमुळे गेली चार दिवस भवानी मंडप येथे पर्यटकांची गर्दी होते आहे. 
पश्चिम महाराष्ट्र

पर्यटक वाढले.. सोयी-सुविधांचे काय ?

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर - पर्यटक वाढावेत म्हणून प्रयत्न होतात; पण वाढलेल्या पर्यटकांना सोयी-सुविधा कोण देणार? पर्यटक कोल्हापूरला यावेत म्हणून दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात प्रयत्न झाले. अजूनही सुरू आहेत. प्रत्यक्षात पर्यटक वाढत असताना त्यांची राहण्याची सोय, पार्किंगची सोय नसल्याचे दिसते. पर्यटकांच्या सोयीसाठी अनेक वेळा बैठका झाल्या, चर्चा झाल्या. मात्र, त्या हवेतच विरल्या. प्रत्यक्षात काम शून्य आहे. 

कोल्हापूरला धार्मिक, ऐतिहासिक व निसर्गाचाही वारसा आहे. तलाव आहे, अभयाअरण्य आहे, गडकिल्ले आहेत. त्यामुळे पर्यटक कोल्हापूरला प्राधान्य येतात. दहा वर्षांत कोल्हापूर महोत्सवासह इतर उत्सव, महोत्सवातून कोल्हापूरचे ‘प्रेझेंटेशन’ झाले. करवीर निवासिनी अंबाबाईसह इतर ठिकाणांचे जोरदार सादरीकरण राज्यभर झाले. परिणामी पाच-सहा वर्षांनंतर त्याचे फायदे दिसत आहेत. नाताळ सुटीच्या निमित्ताने शहरात साधारण चार-साडेचार लाखांहून अधिक पर्यटक कोल्हापुरात आले. त्यांची सोय करण्याची जबाबदारी पर्यायाने पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, महापालिका, पोलिस प्रशासनावर आहे. त्यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच आज कोल्हापुरात येणारे पर्यटक नाराज होऊन जातात. 

देवस्थानचे यात्री निवास होईल का ?
अक्कलकोट, तुळजापूर, शिर्डी, शनिशिंगणापूर, शेगाव अशा धार्मिक ठिकाणी देवस्थानचे स्वतःचे यात्री निवास आहे. तेथे पर्यटकांना महाप्रसादाची सोय आहे. रांगेत उभारलेल्या भाविकांना चहा-नाश्‍ता दिला जातो. यात्री निवासासमोरच पार्किंग व्यवस्था आहे. यापैकी एकही गोष्ट कोल्हापुरात नाही. शहराजवळील बाळूमामाच्या देवस्थाननेही स्वतःचे यात्री निवास आणि पर्यटकांची सोय आहे. आता पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने यात पुढाकार घेऊन पर्यटकांना सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्न करावेत.

पार्किंग प्रश्‍न चर्चेतच..
शहरात एकही भव्य पार्किंग नाही. पर्यटकांनी गाडी कोठे लावायची, हे सांगण्यासाठीही वाहतूक शाखेच्या पोलिसांकडे ठिकाण नाही. उर्मिला टॉकीज, व्हीनस कॉर्नर आणि मध्यवर्ती बस स्थानक परिसर येथे बहुमजली पार्किंगबाबत महापालिकेत बैठका झाल्या, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाशी चर्चा केली, प्रत्यक्षात काहीच झाले नाही. पार्किंगचा प्रश्‍न आज ही जैसे-थे आहे.

नियोजनासाठी पर्याय हवेत...
गर्दीच्या वेळी पर्यटकांच्या वाहनांची सोय कोठे करायची ? त्याचे नियोजन झाले पाहिजे. शहराबाहेरील मैदानावर वाहने थांबवून तेथून अंबाबाई मंदिरापर्यंत मोफत बससेवा हवी. देवस्थान समितीकडे आजही अनेक ठिकाणी जागा उपलब्ध आहे. त्याचा वापर यासाठी करता येईल. टेंबलाई मंदिर परिसरासह शहराच्या चारही बाजूंना स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आणि यात्री निवास झाली पाहिजेत.

केएमटीचे ‘कोल्हापूर दर्शन’ मुहूर्तापुरतेच
दिल्ली दर्शनच्या धर्तीवर केएमटीने अलीकडेच ‘कोल्हापूर दर्शन’ बस सेवा सुरू केली. मात्र, ती मुहूर्तापुरतीच राहिली. सध्या सुरू असलेल्या पर्यटन हंगामात ही सेवा बंद असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले. बसची कोणतीही जाहिरात केलेली नाही. सुट्यांच्या हंगामात याची जाहिरात झाली असती, तर पुढे बससेवेला प्रतिसाद वाढण्यास मदत झाली असती.

संभाव्य पार्किंग व्यवस्था येथे हवी
 संभाजीनगर परिसरातील निर्माण चौक
 महावीर कॉलेज ते मेरीवेदर ग्राऊंड रस्त्यानजीक जागा
 शिरोली नाक्‍याजवळील प्रवेश द्वाराजवळील जागा
 बिंदू चौकातील सुसर बाग, मेन राजाराम हायस्कूल

चार दिवसांत चार लाखांवर पर्यटकांची भेट
असुविधांमुळे पर्यटकांत नाराजी
शहरात प्रचंड वाहतूक कोंडी
देवस्थान, मनपा, पोलिस प्रशासनाचे दुर्लक्षच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT