bjp leader samarjeet ghatge protest in kolhapur
bjp leader samarjeet ghatge protest in kolhapur 
कोल्हापूर

'शेतकऱ्यांना भीक नको मदत द्या' 

सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर - शेतकऱ्यांना भीक नको त्यांच्या हक्काची, शासनाने जाहीर केलेली मदत द्या. अशी मागणी छत्रपती शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केली. चिंचवाड (ता.करवीर) येथे शाहू जनक घराण्याची जनपंचायात शिवार संवाद कार्यक्रमाच्या जिल्हा दौऱ्याच्या शुभारंभवेळी ते बोलत होते. 

यावेळी त्यांनी करवीर तालुक्‍यातील विविध गावातील शेतकऱ्यांच्या व्यथा थेट बांधावर जाऊन समजावून घेतल्या. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे वचनही दिले. 
ते पुढे म्हणाले, अतिवृष्टीमुळे गतवर्षीच्या तुलनेत पश्‍चिम महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत तोकडी आहे. हेक्‍टरी पन्नास हजार रुपये मदत करावी. शासनाने लॉकडाऊन काळातील विज बिल माफीसह केलेली वीज दरवाढ मागे घ्यावी, प्रोत्साहनात्मक अनुदान, दुध अनुदान, वीजबिल माफी' या सर्व बाबी शासनाने शेतकऱ्यांना देण्याच्या केवळ घोषणा केल्या आहेत. शासनाने दिलेला शब्द पाळावा. अशी मागणी आम्ही करीत आहोत. हा शब्द शासनाने न पाळल्यास शेतकऱ्यांच्या फार मोठ्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही श्री घाटगे यांनी यावेळी दिला. 

यावेळी बोलताना माजी आमदार अमल महाडिक म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न शासन गांभीर्याने घेताना दिसत नाही. 
सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. शेतकऱ्यांनी जागं व्हावं यासाठी ही संवाद यात्रा काढली आहे. शेवटी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन मदत देण्यास भाग पाडू. यावेळी किसान मोर्चाचे अध्यक्ष भगवानराव काटे, तुकाराम बोडके, रंगराव तोरकस्कर,संघर्ष कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. 

पंचायत शिवार दौऱ्यासाठी मुख्य रस्त्यापासून शेतात कार्यक्रम असलेल्या बांधापर्यंत समरजितसिंह घाटगे व माजी आमदार अमल महाडिक यांना बैलगाडीतून आणण्यात आले. तर बांधावरील या कार्यक्रमात श्री घाटगे व श्री महाडिक यांना केळीचा घड शेतकऱ्यांच्या हस्ते देऊन शेतकऱ्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचा संदेश दिला. 

कार्यक्रम स्थळाकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूच्या शेतात काही शेतकऱ्यांची भात मळण्याची धांदल सुरू होती. त्यामुळे हे शेतकरी या कार्यक्रमाला जाऊ शकत नव्हते. मात्र राजे तिथे स्वतः थांबले आणि या शेतकऱ्यापर्यंत गेले.त्यांच्या पिकाच्या नुकसानीची माहिती घेतली व आपल्या भावना सरकारपर्यंत या जनपपंचायत शिवार संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचविण्याचे वचन त्यांना शिवारातच दिले. स्वतः राजेंनी शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन संवाद साधल्यमुळे या शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एमके स्टॅलिन यांच्या पत्नीकडून तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात प्रार्थना

Electric Scooters Battery: इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी खराब झाल्यास मिळतात 'हे' संकेत, वेळीच व्हा सावध

SCROLL FOR NEXT