तुरुकवाडी (जि. कोल्हापूर) : प्रलंबित विविध मागण्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत अमरन उपोषण सुरु राहणार असून संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यास कांडवण धरणात सामुहिक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा कांडवण धरणग्रस्तांनी दिला.
कांडवण धरणासाठी संपादित जमीनीचा मोबदला मिळाला, प्रकल्पग्रस्त दाखले मिळावेत, धरणग्रस्तांना शासकीय नोकरी मिळावी, गट नं. 9 मधील 59 हेक्टर 60 जमीन समाजातील शेक-यांचे नावे सात बारा करावा आदी प्रलंबित मागण्यांसाठी आज जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे व धरणग्रस्त शेतक-यांनी कांडवण धरणाच्या पायथ्याशी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
यावेळी बोलताना शंकरराव कांबळे म्हणाले, गेले तीन पिढ्या धरणग्रस्त शासनाचे दरवाजे ठोठावत आहे. सात महिन्यापूर्वी धरणग्रस्त आपल्या मागण्यांसाठी धरणात सामुहिक जलसमाधीसाठी उतरले असता जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, संबंधितांकडून प्रत्यक्ष जागेवर येऊन मागण्यांचे पूर्तता केली जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप कारवाई नाही.
संपादन - धनाजी सुर्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.