कोल्हापूर

३२ हेक्टर पिकाचे नुकसान,गारा विरगळल्या नाहीत

CD

03413, 03414

वाकरेः येथे शुक्रवारी गारांचा पाऊस झाला. या गारा बारा तास विरघळल्या नाहीत. या गारांची लादी दाखविताना महिला शेतकरी
...

वाकरे, कुडीत्रे परिसरात
३२ हेक्टर पिकाचे नुकसान

वाकरेत बारा तास गारा जशाच्या तशा

कुडीत्रे, ता.१६ः शुक्रवारी रात्री करवीर तालुक्याच्या पश्चिम परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले. एक तास विजा चमकत होत्या.
सुमारे दीड तास गारांचा पाऊस झाला. यामुळे वाकरे, कोपार्डे, कुडीत्रे, दोनवडे, खुपिरे येथे सुमारे ३२ हेक्टरहून अधिक पिकांचे नुकसान
झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कृषी सहाय्यक यांच्याकडून पंचनामा सुरू करण्यात आला आहे. वाकरे येथे बारा तास गारा विरगळल्या नसल्याचे चित्र होते.
वाकरे परिसरात सुमारे एक तास गारांचा पाऊस झाला. ऊस पिकाचा पाला गारांनी सोलून काढला. सुमारे १२ तास गारांचा खच विरघळला नव्हता. वाकरे, कोपार्डे, कुडीत्रे, दोनवडे, खुपिरे येथे सुमारे ३२ हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी खात्याच्या सूत्रांनी दिला आहे.
वाकरे येथील सुमारे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले, यामध्ये भाजीपाला, मका पिकाचा समावेश आहे. कुडित्रे येथे सुमारे आठ हेक्टर तर कोपार्डे येथे सुमारे दहा हेक्टर क्षेत्रातील पिकाचे गारा पडल्यामुळे नुकसान झाले. खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी येथे सुमारे दोन हेक्टर पिकाचे नुकसान झाले.

कोपार्डे येथील शेतकरी प्रकाश शिंदे म्हणाले,‘ लक्ष्मी टेक परिसरात सुमारे एक तास गारांनी झोडपून काढले. यामध्ये शाळू पिकाचे मोठे नुकसान झाले. ऊस पिकाचेही मोठे नुकसान झाले असून मका पीक हातचे गेले आहे.’
शेतकरी युवराज पाटील म्हणाले,‘ गणेश नाळवा परिसरात मोठ्या प्रमाणावर गारा पडल्या. त्यामुळे भाजीपाला, ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.’
...

‘वाकरे, कोपार्डे, कुडीत्रे, दोनवडे येथे गारा पडल्यामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस,भाजीपाला पिकांचा समावेश आहे. सर्वे पूर्ण केला आहे. माहिती वरिष्ठांना कळविली आहे.

राहुल पाटील, कृषी सहाय्यक
...

‘शुक्रवारी गारांचा पाऊस झाला, यामध्ये सुमारे १०० शेतकऱ्यांच्या पिकाचे ८० टक्के नुकसान झाले आहे. पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.
अश्विनी पाटील, सरपंच, वाकरे
...

‘मोठ्या प्रमाणावर गारा पडल्यानंतर त्या गोठल्या जातात. तसेच तापमानात अचानक घट झाल्यामुळे त्या एकत्र येऊन मोठी लादी तयार होते. यामध्ये गवताच्या काड्या, गवत मिसळून जाते. अशी लादी लवकर वितळत नाही.

उदय गायकवाड , पर्यावरण तज्ज्ञ,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT