कोल्हापूर

करवीर पीठातर्फे पत्रकार परिषद

CD

करवीर पीठाच्या जमिनींच्या
संदर्भात सरकारची अनास्था

स्वामी विद्यानृसिंह भारती ः उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली

कोल्हापूर, ता. १४ : ‘करवीर पीठाच्या जमिनींसंदर्भात उच्च न्यायालयाने आदेश देऊनही संबंधित यंत्रणांकडून अक्षम्य दिरंगाई होत आहे. यातून सरकारची अनास्था दिसून येते. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची वेळ आलेली आहे,’ अशी माहिती करवीर पीठाचे शंकराचार्य स्वामी विद्यानृसिंह भारती यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘१९९६ मध्ये सरकारने परिपत्रक काढून जिल्हाधिकाऱ्यांना देवस्थान जमिनींचे हस्तांतरण बेकायदेशीर ताबा घेतलेल्यांकडून जमिनी घेऊन त्या देवस्थानला द्याव्यात. त्या जमिनींवर जिल्हाधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे, असे आदेश दिले होते; मात्र कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने २०१० मध्ये करवीर पीठाच्या जमिनी बेकायदेशीर हस्तांतरण झाल्याबद्दल माननीय सभासदांनी प्रश्न विचारले होते. सरकारने विधानसभेच्या पटलावर हस्तांतरण आणि बेकायदेशीर ताबे मान्य केले. त्या अनुषंगाने २०१० चे परिपत्रक काढून धडक मोहीम राबवून जमिनी देवस्थानच्या ताब्यात द्याव्यात, असे आदेश दिले होते. तरीही कोणतीही अंमलबजावणी अजूनही न झाल्याने २०१८ मध्ये उच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये काय करणार, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे आदेश दिले होते. २०१८ मध्ये पुन्हा एकदा परिपत्रक काढून उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देऊन २०१० आणि २०१८ या परिपत्रकाची अंमलबजावणी करण्याचे आदेश देत आहोत, असे उच्च न्यायालयामध्ये प्रतिपादन केले होते. २०२० मध्ये वरील दोन परिपत्रपत्रकांची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. असे असूनही आजतागायत त्याची अंमलबजावणी झालेली नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये पाच ते सहा हजार हेक्टर ही जमीन आहे. जे या जमिनी कसत आहेत, त्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचा सहावा हिस्सा हा मठाला देणे अभिप्रत आहे; पण काही शेतकरी ते प्रामाणिकपणे देतात. तर काहींनी अजूनही हा हिस्सा मठाला दिलेला नाही. जिल्ह्यातील जमीन ही मठाची २० टक्के तर बेकायदेशीरपणे हस्तांतरण झालेल्या जमिनीचे प्रमाण ८० टक्के आहे. यासाठी शासनाने जिथे कुठे असे हस्तांतरण झाले आहे, याचा शोध घ्यावा.’ पत्रकार परिषदेला अध्यक्ष ॲड. सुरेश कुलकर्णी-चुयेकर, कार्यवाह शिवस्वरूप भेंडे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT