कोल्हापूर

सुमंगलम- आकाश तत्व

CD

फोटो-83811
.....

आकाशतत्त्व
प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील

सजग जीवनशैलीचा
अवलंब करावाच लागेल
पंचमहाभूतांपैकी आकाश हे प्रथम तत्त्व म्हणजेच ब्रह्मतत्त्व मानले जाते. या तत्त्वापासूनच पुढे बाकीच्या तत्त्वांची निर्मिती झाली आहे. हे तत्त्व प्रत्यक्षात दाखविता येत नसले तरी ते अतिसूक्ष्म जागेतही असते आणि अतिविराट जागेतही पाहायला मिळते. ब्रह्मांड किंवा विश्वनिर्मितीपासूनच ते आपल्याला अनुभवायला मिळते. किंबहुना, विविध माध्यमांतून याबाबतचा सखोल अभ्यास झाला आहे. सुमारे १३ हजार ७०० करोड वर्षांपूर्वी झालेल्या महाविस्फोटातून वायुस्वरूप प्रकटले आणि त्यातून वायुतत्त्वाची निर्मिती झाली. ते ज्या मूळ कणापासून तयार झाले, त्याबाबतची मांडणी कणाद ऋषींनी पूर्वीच केली आहे.
अलीकडच्या काळातही त्याबाबतच्या विविध संज्ञा तयार झाल्या आहेत. महाविस्फोटानंतर गुरुत्वाकर्षणामुळे विविध प्रकारचे वायू एकत्र येऊन अग्नितत्त्व म्हणजेच ताऱ्यांचीही निर्मिती झाली. प्रत्येक ताऱ्याचे स्वतंत्र गृहमंडल, सूर्यमाला, जीवाश्म, विविध वनस्पती यातून जल आणि पृथ्वी ही तत्त्वे निर्माण झाली. एकूणच, आकाश तत्त्वाचा विचार केला तर आकाशात ८८ प्रकारची नक्षत्रे आहेत. त्यातील ३६ नक्षत्रे उत्तर गोलार्धात आहेत आणि त्या ३६ पैकी २७ नक्षत्रे पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या फिरण्याच्या मार्गावर आहेत. या साऱ्यांचा १२ राशींशी संबंध आहे. हा सारा अभ्यास सर्वांनी जाणून घेणे गरजेचे आहे. कारण, आकाश तत्त्वापासूनच बाकीची तत्त्वे निर्माण झाली. ज्या नैसर्गिक गोष्टीला आकाश तत्त्व अधिक मिळाले, त्याची प्रगती अधिक झाली आणि ज्या नैसर्गिक गोष्टीला आकाश तत्त्व कमी मिळाले, त्याची प्रगती कमी झाली, हे आजवरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आकाशातील ग्रह, तारे आणि एकूणच खगोलीय अभ्यासाच्या माध्यमातून देशातील अनेक मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूंची निर्मिती झालेली दिसते. त्या-त्या ठिकाणची वैशिष्ट्ये वेगळी असून, अलीकडच्या काळात बदलत्या वातावरणामुळे ही वैशिष्ट्येही पुसून टाकली जातात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याबाबतचा अभ्यास विविध माध्यमांतून सुरू असला, तरी जागतिक तापमान वाढ, त्यामुळे बदललेले वातावरण आणि त्यातून होणारे परिणाम हेच त्याचे प्रमुख कारण आहे, हे वारंवार स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आपल्याला बऱ्याचदा अनेक अनपेक्षित खगोलीय घटना अनुभवायला मिळत आहेत. एकूणच, वनस्पती असो किंवा माणूस त्याच्या उत्क्रांतीमध्ये पंचमहाभूतांचे महत्त्वाचे स्थान आहे आणि या पंचमहाभूतांमध्ये असंतुलन निर्माण झाले तर आपले भविष्य अंधकारमय असेल. त्यामुळे आता या प्रत्येक गोष्टीबाबत सजग होऊन प्रत्येकाने आपापली जीवनशैली अंगीकारली पाहिजे.

हे करावेच लागेल...
-विविध खगोलीय घटनांचा अभ्यास करून तज्‍ज्ञांनी उपाय सुचवावेत
-तज्‍ज्ञांनी दिलेल्या सूचनांवर योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे
-ऋषीमुनींनी केलेल्या अवकाश निरीक्षणाच्या आधारावर सद्यस्थितीचा अभ्यास व्हावा
-वैयक्तिक पातळीवर स्वतःसाठी कृती आराखडा करून तो राबविला पाहिजे
-केवळ चर्चा न करता नवीन संशोधनावर भर हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fetus Gender Testing Center: गर्भलिंग चाचणी केंद्र कळवा अन् एक लाख रुपये मिळवा! काय आहे 'ही' योजना जाणून घ्या

Pune: अर्धवट कपडे अन् हातात विळा, बसमध्ये चढून व्यक्तीचा तरुणावर हल्ला अन्...; व्हायरल व्हिडिओनं बारामती हादरलं

Mumbai News: धारावी पुनर्वसनावरून नागरिकांचा रोष, मुलुंडमध्ये स्थलांतर विरोधात उपोषण; मविआचा पाठिंबा

Malegaon Bomb Blast : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात पंतप्रधान मोदींना अडकवण्याचा होता कट; साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

Latest Maharashtra News Updates Live: पतीने केला पत्नीचा खून

SCROLL FOR NEXT